भारत-रशियामध्ये ४०,००० कोटींचा करार

    04-Jan-2019
Total Views |

  
 
अमेरिकेचा दबाव झुगारून भारताने रशियासोबत तब्बल ४०,००० कोटी रुपयांचा करार केला. या कराराअंतर्गत भारत अत्यंत ताकदीच्या एस ४०० मिसाइल्स रशियाकडून विकत घेणार आहे.

२०१४मध्ये पुतिनच्या नेतृत्वाखाली युक्रेन देशातील क्रिमीया प्रांत रशियाने काबीज केला. अमेरिकेसह युरोपातील अनेक प्रभावी राष्ट्रांनी याचा विरोध केला होता. ऑगस्टमध्ये रशियाशी कोणताही संरक्षण विषयक करार करणार नाही अशी भूमिका अमेरिकेतील ट्रम्प सरकारने घेतली. तसंच रशियाशी संरक्षण करार करणाऱ्या देशांवर जाचक निर्बंध लादले जातील असंही अमेरिकेन स्पष्ट केलं. भारताने रशियाशी कोणत्याहीप्रकारे रशियाशी सलगी करू नये अशी अमेरिकेची भूमिका आहे. पण या विरोधाला झुगारून एस४०० मिसाइल्ससाठी भारताने हा करार केला आहे. भारतीय सैन्याच्या ताफ्यात अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची संख्या खूप कमी आहे. त्या उलट पाकिस्तान आणि चीनकडे मात्र आधुनिक शस्त्रांचा साठा मुबलक प्रमाणात आहे. हे हेरूनच गेल्या दोन तीन वर्षांत भारताने मोठ्या प्रमाणात आधुनिक शस्त्रांची खरेदी केली आहे.