दिल्ली वार्तापत्र
- श्यामकांत जहागीरदार
Left-MCP-Hindu डाव्या पक्षांची विशेषत: माकपाची गेल्या काही वर्षांत जी घसरण सुरू झाली आहे, ती थांबायचे नाव घेत नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माकपाला चार, भाकपाला दोन तर भाकपा मालेलाही दोन अशा फक्त आठ जागा डाव्या आघाडीला देशभरात मिळाल्या. Left-MCP-Hindu डाव्या पक्षांची निष्ठा आपल्या देशावर नाही तर चीन आणि रशियावर असल्याचे नेहमीच म्हटले जात होते. त्यामुळे चीन आणि रशियात पाऊस सुरू झाला की, डाव्या पक्षांचे नेते आपल्या देशात डोक्यावर छत्री धरतात, असे उपरोधाने म्हटले गेले. Left-MCP-Hindu देशात हिंदुत्वाचा मुद्दा जसजसा जोर धरू लागला, उजव्यांची राजकीय ताकद वाढू लागली, तसतसा डाव्यांचा जनमानसातील प्रभाव कमी होऊ लागला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डाव्या पक्षांच्या विचारधारेवरचा लोकांचा विश्वास उडू लागला. Left-MCP-Hindu ज्या पक्षांची मुळं आपल्या देशाच्या मातीत रुजली नाही, वाढली नाही, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न देशातील जनतेला पडला नसता तर आश्चर्य होते.

कधीकाळी देशातील केरळ, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांत माकपाची सरकारे राहात होती; आता फक्त केरळमध्ये माकपाच्या नेतृत्वातील डाव्या आघाडीचे सरकार आहे. पश्चिम बंगालमध्ये तर तीन दशकांपेक्षा जास्त काळ माकपाची सत्ता होती. ज्योती बसू यांनी जवळपास २४ वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद भूषवले. Left-MCP-Hindu त्यांच्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य १० वर्षे मुख्यमंत्रिपदावर होते. माकपाच्या लोकसभेतील जागाच कमी झाल्या नाही तर गेल्या काही वर्षांत त्यांच्या मतांच्या टक्केवारीतही लक्षणीय घट झाली. त्यामुळे देशातील डाव्या पक्षाच्या विशेषत: माकपाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या स्थितीला माकपाचे विद्यमान नेतृत्व म्हणजे सीताराम येचुरी आणि प्रकाश कारथ कारणीभूत असल्याचे मानले जाते. ज्योती बसू हे माकपामधील जनाधार असलेले नेते होते, त्यामुळे त्यांनी आपल्या नेतृत्वात माकपाला सातत्याने सत्तेत ठेवले. Left-MCP-Hindu त्यानंतर आलेले बुद्धदेव भट्टाचार्य यांना बसूंसारखी लोकप्रियता मिळाली नाही.
प्रकाश कारथ आणि सीताराम येचुरी यांच्यासारख्या जनाधार नसलेल्या नेतृत्वामुळे माकपाची दयनीय स्थिती झाली आहे. २००४ च्या लोकसभा निवडणुकीतील माकपाची कामगिरी ही आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी म्हणावी लागेल. त्यावेळी ६९ जागा लढवणाऱ्या माकपाने ४३ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी माकपाला ५.६६ टक्के मते मिळाली होती. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत माकपाने ८२ जागा लढवत फक्त १६ जागा जिंकल्या. Left-MCP-Hindu यावेळी जास्त जागा लढवूनही माकपाच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाली नाही; उलट माकपाची मते कमी होत ती ५.३३ टक्क्यांवर आली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत माकपाने आणखी जास्त म्हणजे ९३ जागा लढवत फक्त ९ जागा जिंकल्या. यावेळी माकपाच्या मतांची टक्केवारी ३.२५ होती. २०१९ मध्ये ६९ जागा लढवणाऱ्या माकपाला फक्त ३ जागा qजकता आल्या. माकपाच्या मतांची टक्केवारी आणखी घसरत १.७५ टक्क्यावर आली. या निवडणुकीत केरळमध्ये एक आणि तामिळनाडूत दोन जागा या पक्षाने qजकल्या. त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये या पक्षाचे खातेही उघडू शकले नाही.
Left-MCP-Hindu २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ४ जागा माकपाने जिंकल्यामुळे माकपाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम राहिला, अन्यथा त्याला तो गमवावा लागला असता. यावेळी माकपाने देशभरात ५२ जागा लढवत ४ जागा जिंकल्या. यात केरळ आणि राजस्थानमधील प्रत्येकी एका तर तामिळनाडूतील दोन जागांचा समावेश आहे. द्रमुकसोबतच्या आघाडीमुळे माकपाला तामिळनाडूत दोन जागा जिंकता आल्या. माकपाची ही घसरण फक्त लोकसभा निवडणुकीपर्यंतच मर्यादित राहिली नाही, तर ती त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतही झाली. १९७७ ते २०११ अशी जवळपास ३४ वर्षे पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांची राजवट होती. २००६ मध्ये माकपाने राज्यातील २९४ जागा लढवत १७६ जागा जिंकल्या होत्या. Left-MCP-Hindu ३७.१३ टक्के मते माकपाला मिळाली होती. त्यानंतर राज्यातही माकपाची जी घसरण सुरू झाली, ती २०११ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाने पूर्ण झाली. २०११ नंतर राज्यात ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे युग सुरू झाले. २९४ जागा लढवणाऱ्या माकपाला या निवडणुकीत फक्त ४० जागा जिंकता आल्या. या निवडणुकीतून माकपाला ३४ वर्षांची राज्यातील आपली सत्ता गमवावी लागली असली तरी मतांच्या टक्केवारीत मात्र लक्षणीय घट झाली नाही.
माकपाला या निवडणुकीत ३०.०८ टक्के मते मिळाली. २०१६ नंतर मात्र माकपाची खऱ्या अर्थाने घसरण सुरू झाली. २०१६ मध्ये २९४ जागा लढवणाऱ्या माकपाला फक्त २६ जागा जिंकता आल्या. Left-MCP-Hindu मतांची टक्केवारीही १९.७५ वर आली. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत तर राज्यात माकपाची स्थिती आणखी दयनीय झाली. २९४ जागा लढवणाऱ्या माकपाला राज्यात एकही जागा qजकता आली नाही. मतांची टक्केवारीही ४.७१ वर आली. त्रिपुरात १९९३ ते २०१८ पर्यंत माकपाच्या नेतृत्वातील आघाडीची सत्ता होती. २००८ मध्ये माकपा आघाडीने राज्यातील ६० जागा लढवत ४६ जागा जिंकल्या होत्या. माकपा आघाडीची मतांची टक्केवारी ४८.०१ होती. २०१३ मध्ये माकपा आघाडीने ६० लढवत ४९ जागा जिंकल्या. यावेळी आघाडीची मतांची टक्केवारी ४८.११ होती. Left-MCP-Hindu २०१८ ची त्रिपुरा विधानसभेची निवडणूक माकपाने काँग्रेससोबत लढवली; मात्र ती आपला पराभव टाळू शकली नाही. आघाडीला फक्त १६ जागा मिळाल्या. आघाडीच्या मतांची टक्केवारी ४२.२२ होती. २०२३ मध्ये ४७ जागा लढवत माकपाने फक्त ११ जागा जिंकल्या. आघाडीच्या मतांची टक्केवारी २४.६२ होती. केरळमध्ये २०११ च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता माकपाची कामगिरी बऱ्यापैकी होती. २००६ मध्ये माकपाने १४० लागा लढवत ६१ जागा जिंकल्या होत्या.
२०११ मध्ये माकपाला ४५ जागा मिळाल्या. २०१६ मध्ये माकपाने ५८ तर २०२१ मध्ये ६२ जागा जिंकल्या. Left-MCP-Hindu राज्यसभेत माकपाचे आतापर्यंत पाच सदस्य होते; मात्र त्यातील एका सदस्याचा कार्यकाळ १ जुलैला संपल्यामुळे तेथे आता त्याचे चार सदस्य उरले आहेत. म्हणजे या पक्षाचे लोकसभा आणि राज्यसभेत प्रत्येकी चार सदस्य आहेत. राज्यसभेतील पाचपैकी चार सदस्य केरळमधील तर फक्त एक पश्चिम बंगालमधील आहे. सामान्यपणे माकपा आणि एकूणच डावे पक्ष नेहमीच काँग्रेस आघाडीसोबत राहिले. सध्या डावे पक्ष इंडिया आघाडीचा भाग आहेत. यातील गंमत म्हणजे पश्चिम बंगालमध्ये एकत्र निवडणूक लढवणारे काँग्रेस आणि डावे पक्ष केरळमध्ये मात्र एक-दुसऱ्याविरुद्ध निवडणूक लढतात. Left-MCP-Hinduकेरळच्या वायनाडमध्ये राहुल गांधी यांनी भाकपाच्या उमेदवार अॅनी राजा यांचा पराभव केला. अॅनी राजा या भाकपाचे महासचिव डी. राजा यांच्या पत्नी होत. विशेष म्हणजे राहुल गांधींनी राजीनामा दिल्यामुळे वायनाडमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेस महासचिव प्रियांका वढेरा यांची लढत पुन्हा एकदा अॅनी राजा यांच्यासोबत होते की डावी आघाडी तेथे नवीन उमेदवार देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.
९८८१७१७८१७