छत्तीसगड,
Chhattisgarh High Court छत्तीसगडमध्ये वाढदिवसाचे सार्वजनिक ठिकाणी जल्लोषात आयोजन करण्याच्या वाढत्या प्रकारांवर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारच्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुख्य न्यायाधीश रमेश कुमार सिन्हा आणि न्यायमूर्ती अमितेंद्र प्रसाद यांच्या खंडपीठाने राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
न्यायालयाने Chhattisgarh High Court स्पष्टपणे म्हटले की, “आता राज्य शासन अपयशी ठरत आहे. आम्हाला वाटते की, या प्रकरणांतील थेट संबंधित व्यक्तींनाच आता पक्षकार बनवावे लागेल आणि न्यायालयीन आदेशांच्या उल्लंघनाबद्दल त्यांच्या विरोधात खटला चालवावा लागेल.” कोर्टाने हे विधान एका अशा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केले, ज्यात राज्याच्या आरोग्यमंत्री यांच्या खाजगी सचिव राजेंद्र दास यांनी त्यांच्या पत्नीचा वाढदिवस रस्त्यावर साजरा केला होता.ही घटना कोरबा जिल्ह्यातील चिरमिरी नगरपालिकेच्या हद्दीतील सोनावनी नाका (दादू लाहिड़ी चौक) येथे घडली. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली. न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की, जेव्हा आरोग्यमंत्री यांचे नाव प्रकरणात येत आहे, तेव्हा त्यांनी स्वतःहून याची दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी.
राज्यभरात गेल्या काही महिन्यांपासून वाढदिवस साजरे करण्यासाठी रस्त्यावर गाड्या उभ्या करून, मोठ्या प्रमाणावर केक कापणे, फटाके फोडणे आणि स्टंट करण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. रायपूर, बिलासपूर, बलरामपूर-रामानुजगंज अशा विविध भागांतील अशा घटना न्यायालयाच्या दृष्टीस पडल्या असून न्यायालयाने वेळोवेळी शासनाला निर्देश दिले आहेत. मात्र, या प्रकारांमध्ये काहीही फरक पडत नसल्याची तक्रार न्यायालयाने व्यक्त केली.
अलीकडेच, डीएसपी तस्लीम आरिफ यांच्या पत्नीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात ती नीली बत्तीच्या कारच्या बोनटवर केक कापताना दिसली. हे प्रकरण न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली होती. त्याचप्रमाणे रायपूरमध्ये महापौरपुत्र, एका काँग्रेस नेत्याचा मुलगा, तसेच एका मॉल मालकाचा मुलगा यांनी देखील रस्त्यावर उत्सव साजरे केले होते.
बिलासपूरजवळील Chhattisgarh High Court रतनपूर बायपास रोडवर काही तरुणांनी तर चक्क तलवारीने केक कापत वाढदिवस साजरा केला. परिणामी वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक गैरसोयीची परिस्थिती निर्माण झाली. या प्रकरणात पोलिसांनी १५ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून वाहनांसह एक तलवार जप्त करण्यात आली. यामध्ये ९ जण अल्पवयीन होते, तर उरलेल्या ६ जणांची वय फक्त १८ वर्षे होती.राज्य सरकारचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महाधिवक्त्याला सुनावणी दरम्यान न्यायालयाने फटकारले. न्यायालयाने म्हटले, “तुम्ही केवळ एफआयआर दाखल करता, आरोपी काही हजार रुपयांचा दंड भरून सुटतात. ही न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राला थेट आव्हान देणारी बाब आहे. तुम्ही राज्याच्या वतीने काही करत नसाल, तर आम्हीच आता हे प्रकरण हाताळू.”छत्तीसगड उच्च न्यायालयाच्या या कडक भूमिकेमुळे प्रशासनाला अशा घटनांवर आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावी लागणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी कायद्याचे उल्लंघन करून वाढदिवस साजरे करणाऱ्यांवर आता न्यायालयीन कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे स्पष्ट संकेत यामधून मिळतात.