एलओसीवर जवानांच्या सतर्कतेने घुसखोरी रोखली; 2 दहशतवादी ठार

    दिनांक :14-Oct-2025
Total Views |

श्रीनगर,
loc terrorists killed उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील माछल सेक्टरमध्ये सोमवारी संध्याकाळी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा यशस्वीपणे अंत केला. या कारवाईनंतर संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली असून सीमेवरील सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे. ही घटना कामकाडी परिसरात घडली. नियंत्रण रेषेवर नियमित गस्त घालणाऱ्या भारतीय जवानांनी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास काही सशस्त्र व्यक्ती भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना पाहिल्या. तात्काळ जवळच्या चौक्यांना इशारा देण्यात आला आणि जवानांनी स्वतःची रणनिती मजबूत केली.
 

दहशदवादी हल्ला  
 
 
जसेच घुसखोरांनी नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला, तसे त्यांना ललकारण्यात आले. मात्र, पळून जाण्याच्या प्रयत्नात दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल भारतीय सैनिकांनी देखील गोळीबार केला आणि सुमारे ४० मिनिटे तीव्र चकमक सुरू राहिली. गोळीबार थांबल्यानंतर सैनिकांनी परिसराची तपासणी मोहीम सुरू केली आणि दोन दहशतवाद्यांचे मृतदेह हाती लागले.loc terrorists killed त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळाही जप्त करण्यात आला आहे. सुरक्षादलांकडून या घटनेनंतर सीमेवरील सर्व भागात निगराणी वाढवण्यात आली असून, अधिक घुसखोरीचे प्रयत्न होऊ नयेत म्हणून चौक्यांवर सज्जता वाढवण्यात आली आहे.
सेना सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवादी हे पाकव्याप्त काश्मीरमधील एका गटाशी संबंधित होते आणि भारतीय हद्दीत प्रवेश करून हल्ल्याची योजना आखत होते. मात्र, जवानांच्या सतर्कतेमुळे आणि तात्काळ प्रतिसादामुळे त्यांची योजना पूर्णपणे फसली. गेल्या काही आठवड्यांपासून उत्तर काश्मीरच्या सीमाभागात घुसखोरीचे प्रयत्न वाढले असून, भारतीय लष्कराने अनेक अशा कारवाया यशस्वीरीत्या उधळल्या आहेत. सुरक्षा दलांनी स्पष्ट केले की, “भारताच्या सीमांची अखंडता अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक प्रयत्नाला ठोस उत्तर दिले जाईल.”