मुंबई,
Ram Mandir Station Viral Video एक अनोखी आणि धाडसी घटना मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्थानकावर घडली, ज्याने सर्वांना माणुसकी आणि धैर्याचा आदर्श दाखवला. काल रात्री सुमारे १२.४० च्या सुमारास गोरेगाव रेल्वे स्थानकावरून एक गर्भवती महिला लोकल ट्रेनमध्ये मुंबईकडे प्रवास करत होती. अचानक तिला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि ती मदतीसाठी ओरडू लागली. परंतु, ट्रेनमधील इतर प्रवासी गप्प राहिले, आणि कोणीही मदतीसाठी धावून आले नाही.
अशा नाजूक परिस्थितीत, ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या विकास दिलीप बेद्रे या तरुणाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. त्याने तात्काळ ट्रेनची इमर्जन्सी चैन ओढली, आणि त्या क्षणी ट्रेन राम मंदिर स्थानकावर थांबली. महिलेच्या वेदना प्रचंड वाढल्या होत्या आणि तिचे बाळ अर्धे बाहेर तर अर्धे आत अडकले होते.रेल्वे स्थानकावर कोणत्याही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हत्या आणि रुग्णवाहिकेचा पोहोचायला काही वेळ लागणार होता. यामुळे, विकास बेद्रे यांना अधिक वेळ घालवता येणार नव्हता. या परिस्थितीत, त्याने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. त्याने तात्काळ व्हिडीओ कॉलद्वारे त्याच्या मैत्रिणी, डॉ. देविका देशमुख यांच्याशी संपर्क साधला. डॉ. देविका देशमुख याही मध्यरात्री १ वाजता माणुसकीच्या भावनेने त्वरित प्रतिसाद दिला आणि व्हिडीओ कॉलवर प्रसूती प्रक्रिया स्टेप-बाय-स्टेप समजावून सांगितली.
विकास Ram Mandir Station Viral Video बेद्रे यांनी कोणत्याही वैद्यकीय अनुभवाशिवाय, डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले. त्यांच्या अफाट धैर्यामुळे, काहीच वेळात महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाच्या रडण्याचा आवाज स्थानकावरून ऐकू येताच उपस्थित प्रवाशांनी आनंदाच्या निःश्वास सोडला.
या घटनेनंतर, विकास बेद्रे आणि डॉ. देविका देशमुख यांच्या धाडसी प्रयत्नांना सर्वत्र प्रचंड कौतुक मिळालं आहे. त्यांची माणुसकी आणि धैर्याची भावना सामाजिक मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक लोक विकास बेद्रे यांना "देव माणूस" असे संबोधत आहेत.
सौजन्य : सोशल मीडिया
सध्या, त्या गर्भवती महिलेला आणि तिच्या गोंडस बाळाला कोणतीही शारीरिक समस्या नसून, दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. या घटनेने एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे की, माणुसकी आणि तत्परता असलेल्या एका व्यक्तीमुळे दोन जीवनांचा बचाव होऊ शकतो. विकास बेद्रे यांच्या धाडसी कृत्याने निश्चितच समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे, जो आपल्याला संकटाच्या वेळी एकमेकांच्या मदतीसाठी धावून जाऊन माणुसकीला महत्त्व देण्याची शिकवण देतो.