Three zodiac signs will get financial gains after Diwali वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालींमुळे मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो. यंदा दिवाळीनंतर सहा दिवसांनी, म्हणजे २६ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री २:४४ वाजता एक अत्यंत शुभ नवपंचम राजयोग तयार होणार आहे. बुध आणि शनी ग्रह या वेळी त्रिकोण भावात असतील, जे आर्थिक समृद्धी, प्रगती आणि सकारात्मकतेचे संकेत देत असल्याचे मानले जाते. ज्योतिषानुसार, या योगाचा विशेष लाभ मिथुन, कन्या आणि मकर राशींवर दिसेल.
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरेल. बुध ग्रहाचा त्रिकोण योग कामातील अडथळे दूर करेल, आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे, पदोन्नती किंवा पगारवाढ होऊ शकते. कुटुंबीयांचा पाठिंबा आणि सन्मान मिळेल, तसेच प्रवासातून नवे अनुभव मिळतील. प्रेमसंबंधात स्थिरता आणि मानसिक शांतता लाभेल.
कन्या राशीसाठी नवपंचम राजयोग विशेष फलदायी ठरेल. मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता, मेहनतीला योग्य फळ आणि विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल. जमीन-जुमल्याशी संबंधित व्यवहार यशस्वी होतील, कार्यक्षेत्रात प्रगतीसाठी नवी दारे उघडतील आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल.
मकर राशीच्या व्यक्तींवर शनीच्या स्वामीभावामुळे हा राजयोग विशेष लाभदायी ठरेल. आयुष्यातील अडथळे दूर होतील, नव्या नोकरीची संधी, पगारवाढ किंवा नवा व्यवसाय सुरू करण्याचे योग संभवतात. आकस्मिक धनलाभ, कुटुंबात आनंदी वातावरण, सामाजिक प्रतिष्ठा आणि कामाच्या ठिकाणी कौतुक व सन्मान वाढेल. प्रवास किंवा मनोरंजनाचे प्रसंग देखील आनंददायी ठरतील. या नवपंचम राजयोगामुळे या तीन राशींच्या लोकांच्या जीवनात आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक दृष्ट्या मोठी उन्नती होण्याची शक्यता आहे.