ऑपरेशन सिंदूरमध्ये ‘डीजीएमओ’चे योगदान

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |

DGMO-3
राष्ट्ररक्षा
ब्रिगेडियर हेमंत महाजन
 
१७ ऑक्टोबर रोजी नाशिक येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये देशाचे राजनाथसिंह यांनी Operation Sindoor ‘ऑपरेशन सिंदूर’मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स’ (डीजीएमओ) चे कौतुक केले. ते म्हणाले, नुकत्याच राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान एचएएलने पूर्ण क्षमतेने आणि २४ तास सेवा देऊन मोलाची भूमिका बजावली. याबद्दल त्यांनी एचएएलचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे विशेष अभिनंदन केले.
 
 
 
डॉ. एस. जयशंकर यांचेही योगदान
Operation Sindoor ‘ऑपरेशन सिंदूर’ भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणाला ठाम भूमिका आणि रणनीतिक आधार दिला, ज्यामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा अधिक बळकट झाली.
 
 
राजकीय भूमिका आणि ठाम संवाद
डॉ. जयशंकर यांनी Operation Sindoor ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर भारताचा राजनैतिक आव्हान सक्षमपणे हाताळले. राजकीय भूमिका आणि ठाम (डिप्लोमॅटिक रोल अँड फर्म कम्युनिकेशन) हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. ‘दहशतवादाला शून्य सहिष्णुता’ ही भारताची भूमिका त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुस्पष्टपणे मांडली. शेजारील देश पाकिस्तानच्या दहशतवादी गटांना रोखण्यासाठी जागतिक सहमती मिळवली.ट्रायलबे सारख्या बहुपक्षीय (मल्टिलॅटरल) मंचांवर भारताने दहशतवादाविरुद्ध कठोर संदेश दिला. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, क्वाड, ब्रिक्स यासारख्या महत्त्वाच्या जागतिक संस्थांकडून भारताला पाठिंबा यश मिळवले.
 
 
परराष्ट्र धोरणातील ठोस निर्णय
Operation Sindoor ऑपरेशन सिंदूरनंतर, सिंधू जलकरार ‘होल्ड’ वर ठेवणे /स्थगित करणे तसेच पाकिस्तानच्या दहशतवादी समर्थनावर कठोरता आणणे आणि हल्ल्याचे सूत्रधार शोधणे यासारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या सहभागी निर्णय प्रक्रियेत डॉ. जयशंकर यांची भूमिका निर्णायक होती. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीला आणि ठोस शिफारसी दिल्या.
 
 
जागतिक सहमती व माहितीचे व्यवस्थापन
डॉ. जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्रालयातील विचार विमर्श समितीसमोर स्पष्ट केले की, पाकिस्तानला स्ट्राईक झाल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांनी याबद्दल कळवण्यात आले. कोणत्याही पाश्चिमात्य मध्यस्थीशिवाय हा लढा भारतीय ‘द्विपक्षीय’ पद्धतीने निर्णायक झाला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला भारताची बंधनकारक प्रतिज्ञा पोहोचवण्यात त्यांनी महत्त्वाची बजावली. टीआरएफ, द रेझिस्टन्स फ्रंट (दहशतवादी गट) ला जागतिक दहशतवादी दर्जा प्राप्त करून देण्यात जयशंकर यांनी प्रयत्न केले.
 
 
प्रभाव आणि परिणाम
डॉ. जयशंकर यांच्या नेतृत्वामुळे भारताने दहशतवादाविरुद्ध कठोर आणि निर्भीड हस्तक्षेप केला, आत्मनिर्भर (सेल्फ रिलायंट) परराष्ट्र धोरण राबवले, पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर दबाव वाढवला, भारताची सुरक्षा आणि सार्वभौमत्व अधोरेखित केले, नॉर्मल’ (संवाद आणि दहशतवाद एकत्र शक्य नाही) असा नवा राजनैतिक दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित केला.
 
 
सीडीएस अनिल चौहान यांचे योगदान
Operation Sindoor ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांचा महत्त्वपूर्ण आणि निर्णायक वाटा होता. त्यांनी स्पष्ट केले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ हे देश (सरकार) पुरस्कृत दहशतवादाला थांबवण्याचा प्रयत्न होता. या ऑपरेशनचा मुख्य उद्देश पाकिस्तानमधून भारतात होणार्‍या दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करणे हा होता. जनरल चौहान यांच्या माहितीनुसार, हे ऑपरेशन रात्री १ ते १:३० या वेळेत आखण्यात आले, जेणेकरून नागरिकांची हानी टाळता येईल. त्यांनी या कारवाईला ‘नवीन प्रकारच्या युद्धाची सुरुवात’ मानले. या युद्धात उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून पाकिस्तानला मार देण्यात आला. यामध्ये जमीन, आकाश, समुद्र आणि सायबर क्षेत्रात भारताचे सामर्थ्य दाखवले गेले. जनरल अनिल चौहान यांनी काळजीपूर्वक नियोजन, तंत्रज्ञानाचा उत्तम वापर आणि उच्चस्तरीय सहकार्य व नेतृत्वाद्वारे या मोहिमेला यशस्वी बनवले. त्यांनी आधुनिक आणि प्रभावी युद्धकौशल्य राबवून भारतीय सैन्याच्या सामरिक (स्ट्रॅटेजिक) क्षमतेची उंची वाढवली आहे.
 
 
जनरल उपेंद्र द्विवेदी यशस्वी नेतृत्व
Operation Sindoor ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे योगदान महत्त्वाचे आणि व्यापक होते. त्यांनी या ऑपरेशनची योजना, रणनीती आणि अंमलबजावणीचे नेतृत्व केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ एक ‘ग्रे झोन’ मध्ये झालेले युद्ध होते, जे पारंपरिक युद्धापेक्षा वेगळे आणि अनपेक्षित परिस्थितींनी भरलेले होते. जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी या तुलना बुद्धिबळ खेळाशी केली. कारण प्रत्येक पथकाच्या पुढील चालींचा आणि शत्रूच्या प्रतिसादांचा अंदाज लावणे हे एक आव्हान होते.
जनरल द्विवेदी यांनी स्पष्ट केले की, २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले आणि त्यांनी २३ एप्रिल रोजी निर्णय घेतला की, ठोस व निर्णायक कारवाई आवश्यक आहे. या ऑपरेशनमध्ये सैनिकांनी पाकिस्तानी प्रदेशात खोलवर घुसखोरी करून दहशतवाद्यांची घेराबंदी केली व त्यांना जबरदस्त दणका दिला. त्यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर, उरी आणि बालाकोटसारख्या आधीच्या हल्ल्यांपेक्षा अधिक व्यापक आणि खोलवर होते. या ऑपरेशनची अंमलबजावणी अतिशय उत्तम रीत्या करण्यात आली. संपूर्ण ऑपरेशनमध्ये जनरल उपेंद्र द्विवेदींची धोरणात्मक नेतृत्व क्षमता, कौशल्ये आणि अनपेक्षित परिस्थिती हाताळण्याची तयारी हे महत्त्वपूर्ण ठरले. त्यांनी या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानच्या दहशतवादी तंत्रांच्या प्रतिकारासाठी एक नवीन आणि प्रभावी रणनीती वापरली होती.
 
 
हवाईदल प्रमुखांची निर्णायक भूमिका
Operation Sindoor ऑपरेशन सिंदूरमध्ये चीफ ऑफ एअर स्टाफ (एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग) यांनी महत्त्वाचा आणि निर्णायक वाटा उचलला. त्यांनी या ऑपरेशनमध्ये भारतीय वायुदलाच्या युद्धकला आणि निर्णायक हल्ल्याच्या क्षमतेसाठी आणि तीनही सैन्य दलांच्या तसेच राष्ट्रीय सुरक्षा एजन्सींच्या समन्वयावर विशेष भर दिला.
एअर चीफ मार्शल यांनी या ऑपरेशनमध्ये वापरलेल्या लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्राचे (एलआरएसएएम) आणि एस-४०० मिसाईल सिस्टीम्स यांचे ‘गेम चेंजर’ म्हणून वर्णन केले, ज्यामुळे शत्रूच्या हवाई अभियानाला उत्तम नियंत्रित करून प्रत्युत्तर देणे अवघड होऊन बसले. एलआरएसएएम आणि एस-४०० उपकरणांचा प्रभावी वापर, सैन्य दलांची समन्वित आणि एकत्रित कारवाई, त्वरित निर्णायक धोरणात्मक निर्णय ही ऑपरेशन यशस्वी आणि निर्णायक ठरण्याची मुख्य कारणे असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
चार वायुसेना अधिकार्‍यांना ऑपरेशनमध्ये उल्लेखनीय कार्यासाठी सर्वोत्तम युद्धसेवा पदकांनी सन्मानित करण्यात आले, तर नऊ लढाऊ वैमानिकांना (फायटर वीरचक्र पुरस्कारन देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण ऑपरेशनमध्ये भारतीय वायुसेना प्रमुखांनी नेतृत्व करीत तीनही सैन्य दलांमध्ये असाधारण समन्वय निर्माण केला.
 
 
मुख्य समन्वयक राजीव घई
डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी  Operation Sindoor ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका बजावली. ते या संपूर्ण ऑपरेशनचे मुख्य समन्वयक होते आणि संपूर्ण सैन्य कारवाईची (मिलिटरी जबाबदारी त्यांनी सांभाळली. डीजीएमओ कार्यालयाच्या माध्यमातून त्यांनी भूदल, हवाई दल आणि नौदल या तीनही दलांच्या ऑपरेशनमध्ये सहकार्य आणि समन्वय साधला. ऑपरेशनपूर्वी आणि त्यादरम्यान, डीजीएमओ यांनी रणनीती आखली, ऑपरेशनचे दिशा-निर्देश (गाईडलाईन्स) ठरवले आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित केली. पाकिस्तानचे डीजीएमओ मेजर जनरल कासिफ यांनी भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई संघर्ष विराम (सिझफायर) साठी संवाद साधला, ज्यामुळे १० मे २०२५ रोजी भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धबंदी शक्य झाली.
 
व्यापक कार्यक्षेत्र : डीजीएमओ म्हणून त्यांचे कार्यक्षेत्र केवळ जमिनीपुरतेच मर्यादित नव्हते, तर त्यांनी दहशतवादविरोधी अभियानांचे नियोजन, मंजुरी, तसेच संबंधित सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांशी संवाद साधून समन्वय वाढवला.
सामरिक नियंत्रणात सहभाग: ऑपरेशन सिंदूर’च्या त्यांचा डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (स्ट्रॅटेजी) या महत्त्वाच्या नव्या पदावरही हात होता, जिथे त्यांनी सैन्याच्या सामरिक नियंत्रणाची (स्ट्रटॅजिक कंट्रोल) जबाबदारी सांभाळली.
 
सेना मुख्यालयाचे योगदान
Operation Sindoor ऑपरेशन सिंदूरमध्ये सेना मुख्यालयाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते. सेना मुख्यालयाने या कारवाईत भारतीय सैन्याच्या विविध अंगांमधील सूचनांचे आदानप्रदान, तंत्रज्ञान, लॉजिस्टिक्स (युद्धसाहित्य पुरवठा) आणि आक्रमक युद्धविषयक नियोजन तसेच अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवले. यामुळे संपूर्ण ऑपरेशन अत्यंत प्रभावीपणे पार पडले.
या सर्व कारणांमुळे, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशामध्ये सेना मुख्यालय आणि डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांचे योगदान निर्णायक होते.
थोडक्यात, Operation Sindoor ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान, चीफ ऑफ स्टाफ जनरल उपेंद्र द्विवेदी, चीफ ऑफ एअर स्टाफ (एअर चीफ मार्शल) अमर प्रीत सिंग आणि डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स जनरल राजीव घई यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते.