नागपूर,
bachchu kadu माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या मोर्चा नागपुरात दाखल झाला आहे. शेतकरी ट्रॅक्टर घेऊन आल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. या मोर्चात ट्रॅक्टर्ससह बैलगाड्या घेऊनही शेतकरी दाखल झाले आहेत. जामठा या ठिकाणी आंदोलनकर्ते मोठ्या प्रमाणावर आंदोलनासाठी बसले असल्यामुळे बुटीबोरी जिल्हा नागपूर येथे खूप मोठा ट्राफिक जाम झाला आहे. त्यामुळे नागपूरकडे जाणे शक्य नाही, फक्त वर्धा पर्यंत जाऊ शकतात.
नागपूर जाणाऱ्या नागरिकांनी वरोरा आनंदवन चौक मार्गे चिमूर -भिसी उमरेड मार्गाने नागपूर जाता येईल. करिता नागरिकांनी त्या मार्गाचा वापर करावा.bachchu kaduनागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि वेळेचे नियोजन करावे. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नागरिकांसाठी सूचना जारी करण्यात आली आहे.
मोर्चामुळे अडकून पडलेल्या नागरिकांची अशी फजिती झाली. आमच्या वाचकांनी पाठविलेली ही छायाचित्रे...