नवी दिल्ली,
Big statement by the Air Force Chief हवाई दल प्रमुख ए.पी. सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या आत सुमारे २०० किलोमीटरपर्यंत हल्ला करत ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडले. या कारवाईत भारताने पाच पाकिस्तानी एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने पाडली, तसेच पाकिस्तानी क्षेपणास्त्र यंत्रणा, चार रडार सिस्टीम, दोन कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि मोठ्या प्रमाणावर एअरफील्डचे नुकसान केले. हँगरमध्ये उभे असलेले एक सी-१३० विमान देखील नष्ट झाले, मात्र या हल्ल्यात पाकिस्तानमधील कोणत्याही नागरीकाला जीवितहानी झाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

ए.पी. सिंह यांनी सांगितले की ऑपरेशन सिंदूर इतिहासात लक्षात राहील आणि यामुळे भारतीय हवाई शक्तीची क्षमता सिद्ध झाली. त्यांनी म्हटले की, भारतीय हवाई दल आवश्यक तेव्हा आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास तयार आहे. Big statement by the Air Force Chief ऑपरेशन सिंदूरमुळे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर भारताने हल्ला करून शंभराहून अधिक दहशतवादी ठार केले.
हवाई दल प्रमुखांच्या म्हणण्यानुसार, भारतीय हवाई दलाने अत्यंत अचूक आणि अभेद्य क्षेपणास्त्रे वापरून शत्रूला मोठा धक्का दिला. त्यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानच्या दाव्यांवर विश्वास ठेवून चुकीच्या मते त्यांना वाटत असेल की त्यांनी भारताची १५ लढाऊ विमाने पाडली आहेत, तर पुढच्या वेळी ते भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यावरून चुकीची अंदाज बांधतील. ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीय सैन्याला हवाई शक्तीचा महत्वाचा अनुभव प्राप्त झाला असून भविष्यातील रणनीतीसाठी याचा मोठा लाभ होईल.