अमृताला सोडून दे, दुसऱ्या मुलीसोबत लग्न लावीन!

सांगलीत नवविवाहितेचा अंत

    दिनांक :07-Oct-2025
Total Views |
सांगली,
end of a newlywed couple in Sangli सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे एका धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ उडवली आहे. नवविवाहिता अमृता ऋषिकेश गुरव, हिने केवळ दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता, तिने सासरच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केली. सासू आणि नवऱ्यांकडून तिच्या सासूच्या आजारपणाच्या खर्चासाठी माहेरहून २ लाख रुपये आणण्याची मागणी तिला केली जात होती, तसेच तिच्यावर सातत्याने मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात येत होता. अमृताच्या आई-वडिलांनी सांगितले की, पती ऋषिकेशकडून वारंवार मारहाण होत असे, तर सासू अनुपमा आणि नणंद ऋतुजा यांनी तिचा सतत अपमान करत तिच्यावर दबाव टाकला. तसेच, तिच्या मामा नंदकिशोर पांडुरंग गुरव यांनी तिला सोडून दुसऱ्या जातीतील मुलीसोबत लग्न लावण्याची धमकी देत मानसिक छळ केला.
 
 
 
end of a newlywed couple in Sangli
अमृता या अमानुष त्रासाला तोंड देऊ शकली नाही आणि शुक्रवारी विषारी द्रव प्राशन केला. तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला तातडीने इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर कोल्हापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. रविवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या आई-वडिलांनी तिला घडलेल्या सर्व प्रकारांची माहिती रुग्णालयात मिळवली. याप्रकरणी इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये पती ऋषिकेश अनिल गुरव, सासू अनुपमा अनिल गुरव, सासरा अनिल मधुकर गुरव, नणंद ऋतुजा अनिल गुरव आणि मामा नंदकिशोर पांडुरंग गुरव यांच्यावर अमृताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.