तभा वृत्तसेवा पारवा,
kakad aarti Parva, घाटंजी तालुक्यातील आदिवासीबहुल क्षेत्र संबोधल्या जाणाèया पारवा येथे रोज सकाळी, दुरून कुठल्यातरी मंदिरातला घंटानाद आपल्या कानावर पडत असेल. तो घंटानाद आहे, काकड आरतीचा. मुख्यत्वे कार्तिक शुद्ध एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत काकड आरती सुरू असते. सध्या ही काकडआरती पारवा येथे सुरू आहे.
काकड आरतीच्या kakad aarti Parva, वेळी काकड्याने (वातीचा एक प्रकार) देवाला ओवाळले जाते, म्हणून या आरतीला काकड आरती म्हणतात. सकाळची झोप मोडून काकड आरतीत सहभागी होऊन बघा. तो आनंद अवर्णनीय आणि शब्दातीत असतो. मंगलमय पहाटे घंटेचा नाद, धुक्याची चादर, उद धुपाचा सुहास आणि त्यात भगवंताची मोहक मूर्ती, यांची एकदा तरी अनुभूती घ्यावीच. काकड आरतीची अनेक काव्य प्रचलित आहेत. जसे की, ‘सत्व रज तमात्मक केला काकडा, भक्ती स्नेहे युक्त ज्ञानाग्नीवर’ या दोन ओळीतून देवाप्रती असलेली तळमळ, आत्मीक संवाद आणि भक्ती प्रकट होते. म्हणून आर्ततेने म्हटली जाते, तिला आरती असे म्हणतात. आरती म्हणजे तबकात अथवा ताम्हणात निरांजनातील दीप प्रज्वलित करून देवाला ओवाळणे. ही ओवाळणी काव्यपदातून एका विशिष्ट चालीने म्हटले जाते. या पदामध्ये साधाक ईश्वराच्या रुपाचे, प्रराकमाचे, कर्तुत्वाचे वर्णन करीत असतो.
विशेषत; यांत kakad aarti Parva, देवाची स्तुती असते. आरतीमुळे उपासकांना कूतार्थतेची जाणीव होते.तो देहभान विसरून परमेश्वराला शरण येतो. यासाठी साधकांनी आरत्यांचे आत्मविष्कार साधन्यासाठी पुढील प्रकार केले आहेत. काकड आरती, धूपआरती, दीपारती, पंचारती, शेजआरती या आरत्या होतात. सत्व, रज, तम हे त्रिगुण नाहीसे होऊन मनुष्याने गुणातीत व्हावे ही भावना या आरतीमागे असते. शिवाय धुपाचा सुवास सर्वत्र दरवळल्यामुळे त्या सुगंधातून देवाचे अस्तित्व जाणवते. दीपारती - साधक निरांजनाने देवाला ओवाळतो त्या निरंजनातील दिव्यांचे तेज तो आपल्या डोळ्यात साठवत असतो. तेज हे देवाचे प्रतीक असल्यामुळे ही आरती केली असता साधकांच्या मनोकामना पूर्ण होतात. पंचारती - पाच वाती एकत्र केलेल्या असून यात फुल वाती लावल्या जातात. त्यानेच साधक आपले पंचप्राण ओतून देवाला ओवाळीत असतो. किंबहुना आपले प्राण देवाला समर्पण करण्याची तयारी. विशेष म्हणजे, या आरतीमुळे साधक ज्योतीस्वरुप देवाच्या शुद्ध प्रेमाची अनुभूती घेतो. शेजारती - हा दिवसातील शेवटचा उपचार असून तो रात्री केला जातो. अशा रीतीने सकाळ संध्याकाळ व रात्री देवाची आरती केल्यानंतर देवाभोवती प्रदक्षिणा घालने अगत्याचे आहे. प्रदक्षिणा - देवाभोवती भ्रमण करणे म्हणजे प्रदक्षिणा होय. या प्रदर्शनात एक सूत्र आहे ते असे की देवाच्या उजव्या बाजूने परिक्रमा करण्याचा प्रघात आहे. याचे कारण असे की देवी शक्ती ही मंत्राधिन असून तिचे तेजोवलय दक्षिणेकडे जात असते. प्रदक्षिणेच्या वेळी हे तेज नकळत भक्ताच्या शरीरात शिरते. त्यामुळे त्यांचे मन पवित्र होऊन थोडक्यात प्रदक्षिणा घालताना साधक देवाशी एकरूप होतो. अर्थात याला शंकराची प्रदक्षिणा अपवाद आहे. यामुळे चालण्याचाही व्यायाम होतो. अशा रीतीने देवपूजेचे सर्व सोपस्कार झाल्यानंतर देवाला नैवेद्य समर्पण करतात.