तभा वृत्तसेवा
मारेगाव,
Yavatmal Chandrapur link मार्डा धरणाच्या पुलाला सुरक्षारक्षक असलेला कठडाच नसल्याने पुलावरील धोका वाढलेला आहे. या पुलावरून जाणे येणे करणे धोक्याचे झाले आहे. याकडे संबंधीत विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. त्यामुळे एखादी अनुचित घटना घडल्यावरच याकडे लक्ष देणार का, असा प्रश्न नागरिक विचारत आहे.यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाèया वर्धा नदीवर दांडगाव-मुक्टा तसेच मार्डा यांच्यादरम्यान वर्धा नदीवर पाणी अडवून धरण बांधण्यात आले आहे. या धरणाचे पाणी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे असलेल्या वर्धा पॉवरप्लांट तसेच जीएमआर या दोन प्लॅन्टसाठी वापरल्या जाते.
या धरणामुळे यवतमाळ जिल्ह्याला कोणताही फायदा होत नाही. उलट नुकसान मात्र यवतमाळ जिल्ह्याचेच जास्त होत असते. यात जनावरे तर, कधी कोणी व्यक्ती डुबून मरण पावल्याच्याही घटना घडल्या आहेत. पुराच्या पाण्याने शेतकèयांचे मोठे नुकसान होत असल्याची तर नित्याचीच बाब बनली आहे.
मारेगाव Yavatmal Chandrapur link तालुक्यातील मार्डी, कुंभा परिसराला मोठी बाजारपेठ म्हणून वरोरा ही जवळ पडते. वर्धा नदीवरील धरणामुळे वरोरा जाणे सोयीचे झाले आहे. यावर्षी झालेल्या मुसळधार पावसाने या पुलावर लोखंडी कठडे पडलेले होते. त्यामुळे काही काळ लोखंडी कठड्यांऐवजी दोर बांधलेला होता. आता तोही काढून टाकण्यात आलेला आहे. पुलाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. आवश्यकता नसताना या पुलावर गतीरोधकही देण्यात आले आहे. एका बाजूची कठडाच नसल्याने दोन्ही बाजूंनी एकाच वेळी वाहने आली तर मोठा अपघातसुद्धा घडू शकतो.
संबंधित विभागाला हे सगळं माहित असूनही याकडे गांभीर्याने बघितले जात नाही. कदाचित या ठिकाणी एखादी जीवितहानी घडल्यानंतरच उपाययोजना केली जाणार आहे का, असे नागरिक बोलत असल्याचे दिसून येते.