व्हिएतनाम,
Triple disaster in Vietnam मुसळधार पावसामुळे मध्य व्हिएतनाममध्ये तिहेरी आपत्ती उभी राहिली आहे. पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला असून अंदाजे ५२,००० घरे पाण्याखाली गेलेली आहेत. सुमारे ६२,००० लोकांना त्यांच्या घरी सुरक्षिततेसाठी स्थलांतर करावे लागले आहे. पूरग्रस्त भाग हे कॉफी उत्पादनासाठी प्रसिद्ध असून समुद्रकिनारे आणि पर्यटनासाठी ओळखले जाते. गेल्या तीन दिवसांत या प्रदेशात १५० सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला असून, बुडालेल्या घरांच्या छतावर अडकलेल्या लोकांना बचाव पथके मदत करत आहेत. नऊ लोक अद्याप बेपत्ता आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे.
मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले असून अनेक प्रमुख रस्ते बंद झाले आहेत, तसेच जवळजवळ १० लाख घरे वीजविरहित आहेत. व्हिएतनाम न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, टायफून कालमेगी पश्चिम आणि वायव्येकडे सरकत आहे आणि मध्य व्हिएतनाममध्ये धडकू शकतो. हवामान विभागाने ह्यू सिटी ते डाक लाक प्रांतापर्यंतच्या किनारी भागात पाण्याची पातळी ०.३ ते ०.६ मीटरने वाढू शकते, असे इशारा दिला आहे. चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे लहान नद्या आणि ओढ्यांमध्ये अचानक पूर येऊ शकतो. याशिवाय, उतारांवर भूस्खलन होऊ शकते आणि शहरी तसेच औद्योगिक क्षेत्रे पूरग्रस्त होण्याची भीती आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे, पण परिस्थिती गंभीर आहे.