वर्धेतील घन कचर्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे अदानीला पत्र
पालकमंत्री भोयर यांची माहिती
दिनांक :24-Nov-2025
Total Views |
वर्धा,
cm fadnavis वर्धा व लगतच्या ग्रापं क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सीएसआर निधीतून हाती घेण्यासाठी अदाणी समूहाने सहकार्य करावे, असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अदाणी फाउंडेशनच्या प्रमुख डॉ. प्रीती अदाणी यांना दिले असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकातून कळवण्यात आले आहे.
वाढती लोकसंख्या, पर्यावरणीय स्वच्छता राखण्यात प्रशासनाला मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी, घनकचर्याचे व्यवस्थापन करताना अनेक अडचणी निर्माण होतात. शहर आणि लगतच्या गावांचा कायापालट करण्यासाठी ‘स्वच्छ वर्धा, सुंदर वर्धा’ हा उपक्रम हाती घेतला आहे.cm fadnavis सामाजिकदृष्ट्या संस्थांकडून सीएसआर निधीद्वारे मदतीची अपेक्षा आहे. या उदात्त प्रयत्नात आपला सहभाग असावा, अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. प्रीती अदाणी यांना केली आहे. सदर प्रकल्पावर अधिक चर्चा करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याशी संपर्क करण्याची विनंतीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी अदाणी समूहाला केली आहे.