... म्हणून अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ

    दिनांक :03-Nov-2025
Total Views |
मुंबई,
amitabh bachchan बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या केवळ भारतातच नव्हे तर साता समुद्रापारही प्रचंड आहे. या चाहत्यांच्या मोठ्या उत्साहामुळे आणि अमिताभ यांच्याबाबत माहितीच्या संवेदनशीलतेमुळे, त्यांच्या घराबाहेर पोलिस सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
 
amitabh bachchan
 
मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर आता २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रस्त्यावर बॅरिकेडिंगसह अतिरिक्त सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांनी सुरक्षा वाढवण्यामागील नेमके कारण अद्याप गुप्त ठेवले आहे, आणि याबाबत अधिक माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. रविवारी, बिग बींच्या चाहत्यांची मोठी गर्दी अपेक्षित असल्यामुळे हा अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
 
 
दरम्यान, देशात सध्या amitabh bachchan  आनंदाचे वातावरण आहे. रविवारी झालेल्या एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. भारताने २९९ धावांचा पाठलाग करत दक्षिण आफ्रिकेला २४६ रन्सवर रोखले आणि वर्ल्ड कप जिंकणारा चौथा संघ ठरला. हा विजय पहिल्यांदा वनडे वर्ल्ड कपमध्ये मिळालेला आहे.अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत भारतीय महिला क्रिकेट संघाचे कौतुक केले. त्यांनी लिहिले, “‘जिंकलो… इंडिया वुमन क्रिकेट… विश्व विजेते… आम्हाला तुमचा अभिमान वाटावा असं तुम्ही काम केलं आहे… शुभेच्छा… शुभेच्छा… शुभेच्छा…’” या पोस्टमुळे देशभरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे.अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर सुरक्षा वाढवण्याचे आणि भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विजयाचे दोन वेगळे विषय सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहेत. बिग बींचा सामाजिक संदेश आणि क्रिकेटपटूंचा गौरव यामुळे दोन्हीच क्षेत्रांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.