८ कोटींचे नुकसान

गॅंग्स ऑफ वासेपुर’ही हिट नाही

    दिनांक :03-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Anurag Kashyap भारतीय चित्रपटसृष्टीतील स्वतःच्या शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या दिग्दर्शक अनुराग कश्यपने नुकताच आपल्या १० वर्षांच्या सिनेमॅटिक प्रवासाबाबत खुलासा केला आहे. त्यांच्या मते, त्यांच्या काही चित्रपटांना लगेच यश मिळाले नाही, तर काही चित्रपटांना वेळ लागला तरी लोकप्रियता मिळाली. विशेष म्हणजे त्यांनी २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गॅंग्स ऑफ वासेपुर’बाबतही स्पष्ट मत व्यक्त केले.
 

Anurag Kashyap, Gangs of Wasseypur, Bollywood director, Indian cinema, film loss 8 crore, film flop, experimental films, Manmarziyaan, Raat Akeli Hai, Secret Games, Agla, Lust Stories, film reviews, box office, Indian film industry, film controversies, Hindi cinema, filmmaker interview, cinematic journey, film success, movie discussion, Bollywood news, film criticism, film popularity, creative filmmaking 
एका समालोचनात्मक मुलाखतीत अनुराग कश्यपने सांगितले की, “गॅंग्स ऑफ वासेपुर ही हिट नाही, ती मोठ्या प्रमाणात फ्लॉप ठरली. त्या चित्रपटातून ८ कोटींचे नुकसान झाले. लोक विचारतात की मागच्या १०-१२ वर्षांत माझ्या कोणत्याही चित्रपटाला हिट मिळाले नाही, तरी मला का संधी मिळते. पण वास्तविकता अशी आहे की माझ्या चित्रपटांना वेळ लागतो, काही चित्रपट सुरुवातीला कमी प्रेक्षकांना भावतात, पण कालांतराने त्यांची किंमत वाढते.”
अनुराग यांनी पुढे सांगितले की, “सध्याची पिढी ज्यावर टीका करते ती पिढी ती चित्रपट थिएटरमध्ये पाहिली नाही, फक्त डाउनलोड करून पाहते. लोक विचारतात की अनुराग कुठे गेला, त्याने चित्रपट का बनवत नाही. पण मी नेहमी स्वतःच्या कल्पनांवर काम करत आलो आहे. ‘मनमर्जी’, ‘राघव’, ‘सीक्रेट गेम्स’, ‘अगली’ आणि ‘लस्ट स्टोरीज’ ही माझी स्वतःची प्रयोगात्मक कामगिरी आहे.”दिग्दर्शकाने असेही सांगितले की, “माझ्या सर्व चित्रपटांचे समीक्षक अभिप्राय खूप चांगले आहेत. ‘गॅंग्स ऑफ वासेपुर’मुळे मला काही नवीन दृष्टिकोन समजले आणि त्याप्रमाणे मी काम करत राहिलो. लोकांनी अनेकदा विचारले, ‘मनमर्जी’ किंवा ‘अगली’ ही चित्रपट चांगले आहेत, पण पाहिले किती लोकांनी? प्रेक्षक थिएटरमध्ये ‘वासेपुर’ पाहायला जातात, त्यात माझी चूक नाही. चित्रपटसृष्टी मला का संधी देते, हे त्यांनीच ठरवलेले आहे.”अनुराग कश्यपने त्यांच्या कामगिरीवर आणि आर्थिक निर्णयांवरही आत्मविश्वास व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, “माझे चित्रपट सस्तेत बनतात आणि एक रुपये वाचवले तरी नुकसान कमी होते. अनेक फ्लॉप चित्रपट दररोज तयार होतात, परंतु माझ्या चित्रपटांची गुणवत्ता आणि मेहनत वेगळी आहे.”
दिग्दर्शकाच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये त्यांच्या कलाकृतीबाबत नव्याने चर्चेला सुरूवात झाली असून, चित्रपटसृष्टीत अनुराग कश्यपच्या प्रयोगात्मक दृष्टिकोनाची पुन्हा एकदा चर्चा होणार आहे.