सर्वच पशूपक्ष्यांविषयी कारुण्य बाळगा : न्या. विवेक देशमुख
*बहार आयोजित पक्षीसप्ताहात लोकजागर
दिनांक :05-Nov-2025
Total Views |
वर्धा,
justice-vivek-deshmukh सर्व संत, विचारवंत आणि समाज सुधारकांनी पशूपक्षी आणि सजीव सृष्टीविषयी कारुण्यभाव जोपासला आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कारुण्याची ही भावना प्रत्येकाने जोपासली तरच पर्यावरणाचा र्हास टाळता येईल, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. विवेक देशमुख यांनी केले.
बहार नेचर फाउंडेशनद्वारे स्थानिक आसमंत स्नेहालय येथे आयोजित पक्षीसप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बहारचे अध्यक्ष डॉ. बाबाजी घेवडे होते. यावेळी समाज कल्याण अधिकारी प्रतिभा भागवतकर, आसमंत स्नेहालयचे संचालक शिवाजी चौधरी, वृक्षमित्र मुरलीधर बेलखोडे, मानद वन्यजीव रक्षक तथा बहारचे उपाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी यांची उपस्थिती होती. पर्यावरणाला हानी पोहचविणार विकास आम्हाला नको आहे, अशी भावना डॉ. बाबाजी घेवडे यांनी व्यत केली. यावेळी उपस्थित अतिथींनीही समयोचित मार्गदर्शन केले. justice-vivek-deshmukh प्रास्ताविक संजय इंगळे तिगावकर यांनी केले. संचालन डॉ. आरती प्रांजळे घुसे यांनी तर आभार बहारचे सचिव जयंत सबाने यांनी मानले. उद्घाटन समारोहाला बहारचे संस्थापक अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, उपाध्यक्ष दीपक गुढेकर, कोषाध्यक्ष राजदीप राठोड, सहसचिव देवर्षी बोबडे, अतुल शर्मा, अॅड. पवन दरणे, घनश्याम माहोरे, पर्यावरणप्रेमी गुणवंत डकरे, बाबाराव भोयर, आकाश जयस्वाल, सेवानिवृत्त वनपाल अशोक भानसे, नरेंद्र पहाडे, याकुब शेख, सुनील ढाले, प्रकाश कांबळे, राकेश काळे, आदींसह वन विभागाचे कर्मचारी, बहारचे सदस्य, सेवाश्रमातील विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.