नवी दिल्ली,
Ahmedabad accident अहमदाबादमध्ये या वर्षी घडलेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. पायलटच्या वडिलांनी अपघाताची स्वतंत्र चौकशी होण्याची मागणी करीत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत न्यायालयाने स्पष्ट केले की, पायलटला दोष देऊ नये आणि वडिलांनी स्वतःवर ओझे लादू नये. प्राथमिक चौकशी अहवालात पायलटविरुद्ध कोणतेही आरोप आढळलेले नाहीत.
अपघात १२ जून रोजी घडला, जेव्हा लंडनला जाणारे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच मेघानी नगर परिसरातील मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले. या दुर्दैवी घटनेत २४२ प्रवाशांपैकी एक वगळता सर्वांचा मृत्यू झाला, तर अपघातस्थळी उपस्थित १९ जणांना देखील जीव गमवावा लागला. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (नोटीस बजावून याबाबत आपले उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे पायलटच्या कुटुंबावरून मानसिक ओझे कमी होण्याची शक्यता आहे.