तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
swami-dipankar : दिल्लीतील ‘भारत मंडपम’ येथे ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन’ प्रस्तुत आणि ‘सनातन संस्था’ आयोजित भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील ‘स्वराजाचा शौर्यनाद’ या प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाला स्वामी दीपांकर यांनी भेट दिल्यानंतर प्रभावित होऊन स्वामीजी म्हणाले, ही शस्त्रप्रदर्शन पाहून अंगावर रोमांच उभे राहिले. हे शस्त्रप्रदर्शन पाहून आपल्याला पूर्वजांविषयी सार्थ अभिमान वाटेल, जीवनाला पुढील दिशा मिळेल. हे प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही अवश्य या, असे आवाहन स्वामी दीपांकर यांनी यावेळी केले.
प्रदर्शनीचे उद्घाटन करताना दिल्लीचे सांस्कृतिक मंत्री कपिल मिश्रा म्हणाले, दिल्लीच्या इतिहासात मोगलांचे मोठे योगदान असल्याचे सतत बोलले जाते, मात्र मोगलांचे योगदान जिèयाएवढेच होते. त्या तुलनेत मराठे, शीख, जाट यांचे मोठे योगदान होते. त्यांचा मोठा इतिहास आहे. मराठ्यांची परवानगी घेऊनच मोगल दिल्लीच्या लालकिल्ल्यातून एक पाऊल बाहेर टाकत असत. हा खरा इतिहास आहे. इंग्रजांनी दिल्ली घेतली, मोगलांकडून नव्हे तर मराठ्यांकडून घेतली, मात्र जाणीवपूर्वक अनेक वर्षे खरा इतिहास लपवला गेला आहे.
या शिवकालीन शस्त्रांचे संग्राहक राकेश धावडे यांनी, शिवकालीन शस्त्रांचे संग्रहालय देशात कुठेच नाही, तर यासाठी कायमस्वरूपी संग्रहालय उभारण्याची विनंती मिश्रा यांच्याकडे केली असता, त्यांनी दिल्लीच्या मधोमध भारतीय शस्त्र परंपरा आणि पारंपरिक शस्त्रे यांचे भव्य संग्रहालय उभारू, असे आश्वासन दिले.
वन्दे मातरम या राष्ट्रजागृतीच्या पवित्र स्तोत्राला यंदा 150 वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक प्रसंगी स्वातंत्र्यलढ्यातील प्रेरक स्मृती, त्याग, राष्ट्रासाठी समर्पण आणि असंख्य क्रांतिकारकांच्या हृदयातील उर्जा जागवणारे प्रदर्शन लावण्यात आले आहे. यात ‘वन्दे मातरम्’चा उगम, संघर्षगाथा व राष्ट्रउभारणीतली भूमिका मांडण्यात आली.
यावेळी लेखिका शेफाली वैद्य, सनातन संस्थेच्या बिंदा सिंगबाळ, अंजली गाडगीळ, सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशनचे अध्यक्ष आणि भारताचे माजी माहिती आयुक्त उदय माहूरकर उपस्थित होते.