नाशिक,
nashik tree plantation आगामी कुंभमेळा 2027 लक्षात घेऊन नाशिकच्या तपोवन परिसरात साधुग्राम उभारणीसाठी होणाऱ्या वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींनी तीव्र विरोध दर्शविला आहे. पुण्यातील श्रीराम पिंगळे यांनी याबाबत राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल केली असून, 15 जानेवारीपर्यंत वृक्षतोडीवर अंतरिम स्थगिती मिळाली आहे.
वृक्षतोडीवर विरोध nashik tree plantation सुरू असतानाच नाशिकमध्ये आज 15 हजार झाडांची लागवड सुरू झाली. या वृक्षारोपण कार्यक्रमाचे शुभारंभ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमात पर्यावरण प्रेमी, साधू-महंत आणि स्थानिक नागरिकांनी सहभाग नोंदविला. मखमलाबाद परिसरात झालेल्या या कार्यक्रमानंतर नाशिक शहरातील विविध भागातही झाडांची लागवड करण्यात येणार आहे. 'हरित नाशिक' या संकल्पनेअंतर्गत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध मोहिमा राबवण्यात येत आहेत.
वृक्षारोपण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी गिरीश महाजन म्हणाले, “आज आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून वृक्षांचा विषय चर्चेचा विषय होता. आता आपण वृक्षारोप अॅप तयार केले आहे. मागील कुंभमेळा काळातील व्यवस्था तशीच राखली जाणार आहे. एकही नवीन राहुटी लावली जाणार नाही. काही दिवसांपूर्वी तिथे झाडे आणि झुडुपे वाढलेली होती, त्यांचे तोडण्याचे विषय चर्चेत आले, मात्र मला याबाबत बोलायचे नाही.”गिरीश महाजन यांनी पुढे सांगितले, “साधू गांजा पितात, असे जे बोलतात ते योग्य नाही. नगरपालिका निवडणुकीनंतर मी झाडे पाहायला गेलो. एक झाड आईच्या नावावर लावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. अजूनही कुठे जागा असेल, तिथे झाडे लावू. 15 हजार काय 25 हजार झाडे लावू. आमदार, नगरसेवकांनी जागा सांगा, आपण झाडे लावू. ही झाडे सीएसआर फंडमधून लावली जात आहेत.”
विरोधकांवर nashik tree plantation निशाणा साधत गिरीश महाजन म्हणाले, “आमच्यावर आरोप करू नका. ही जागा बिल्डरच्या घशात घालण्याचे आरोप करणे योग्य नाही. मागील कुंभमेळ्यामध्येही तुम्ही आमचे काम पाहिले आहे. विविध संस्था, संघटना वृक्षारोपणात सहभागी झाल्या आहेत. आता तुम्ही सांगाल तितकी झाडे लावणार आहोत. नाशिककर म्हणतील की बस झाले, पण आम्ही थांबणार नाही.”तापोवन परिसरात वृक्षतोडी आणि पर्यावरण संवर्धन यावरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हा वृक्षारोपण उपक्रम महत्त्वाचा ठरतो, तर शहरात ‘हरित नाशिक’च्या संकल्पनेला गती मिळवून शहरातील जागरूकता वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.