खामगांव-जालना रेल्वे मार्गासाठी निधीची मागणी

buldhana-khamgaon-railway केंद्रिय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची घेतली भेट

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
बुलढाणा, 
 
 
buldhana-khamgaon-railway इंग्रज काळापासून बहुप्रतिक्षीत आणि राज्य सरकारने 50 % खर्चाला मंजुरात दिलेल्या खामगांव-जालना रेल्वे मार्गाच्या कामावर या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून द्यावा,  अशी आग्रही मागणी केंद्रिय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे केंद्रियमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले उपस्थित होत्या.
 
 
buldhana-khamgaon-railway
 
 
buldhana-khamgaon-railway इंग्रजकाळापासून प्रलंबित असलेला खामगांव-जालना हा रेल्वे मार्ग व्हावा अशी अपेक्षा बुलढाणा लोकसभा मतदार संघातील नागरीकांची आहे. या संदर्भात 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खामगांव येथे झालेल्या जाहीर सभेत हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. महाराष्ट्र सरकारने 15 मार्च 2024 रोजी या रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या 50 % खर्चाच्या मान्यतेला मंजुरात प्रदान करून  हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाकडे पाठविला आहे. या अर्थसंकल्पामध्ये या रेल्वेमार्गावर निधी उपलब्ध करून द्यावा,  अशी मागणी केंद्रिय आयुष आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आज 16 डिसेंबर रोजी दिल्ली येथे केंद्रिय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्षात भेट घेऊन केली आहे. buldhana-khamgaon-railway यावेळी त्यांच्यासोबत चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील, विद्याधर महाले, डॉ. आशुतोष गुप्ता, गोपाल तुपकर, शेख अनिस शेख बुढन, रेणुकादास मुळे, डॉ. किशोर वळसे उपस्थित होते.
 
 
  रेल्वेमंत्र्याच्या भेटी दरम्यान दिलेल्या या पत्रात त्यांनी नमुद केले आहे की, बुलढाणा जिल्हयातील खामगांव-जालना रेल्वे मार्ग व्हावा अशी माझ्यासह जिल्ह्यातील नागरीकांची अपेक्षा आहे. हा मुद्दा विकासासोबतच लोकभावनेचा सुध्दा आहे. हा रेल्वे मार्ग विदर्भ मराठवाडा या दोन विभागांना जोडणारा आहे. buldhana-khamgaon-railway शिवाय मध्य रेल्वे आणि दक्षिण रेल्वे मार्गांनाही जोडणारा ठरणार असुन सध्या प्रलचित असलेल्या मध्यरेल्वे आणि दक्षिण रेल्वे मार्गातील अंतर कमी करणारा ठरणार आहे. या मागणीला रेल्वेमंत्र्यांनीही सकारत्मकता दर्शविली आहे.