ढाका,
Bangladesh's reckless statement बांगलादेशाने १९७१ च्या युद्धातील भारताच्या विजयाबाबत विवादास्पद विधान केले आहे. अंतरिम सरकारने म्हटले आहे की भारताने बांगलादेशी पाठिंब्याशिवाय पाकिस्तानवर विजय मिळवणे शक्य नव्हते. ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केल्यावर परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेश उच्चायुक्तांना बोलावले. ढाकातील परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहिद हुसेन म्हणाले की भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला हे खरे आहे, परंतु बांगलादेशी स्वातंत्र्यसैनिकांशिवाय हा विजय शक्य झाला नसता. त्यांनी सांगितले की बांगलादेशी लढवय्ये युद्धात किमान सहा महिन्यांपासून सक्रिय होते आणि जूनपासून स्वातंत्र्य चळवळ युद्धात पूर्णपणे सामील झाली.

बुधवारी ढाकेत शेकडो निदर्शक ‘जुलै युनिटी’ बॅनरखाली कूच करत भारतीय उच्चायुक्तालयाजवळ जमले. पोलिसांनी त्यांना रोखले. निदर्शकांनी भारतविरोधी घोषणा केल्या आणि मागील वर्षी पळून गेलेल्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना व इतर नेत्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ढाका येथील सुरक्षा परिस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली असून, या घटनांमुळे भारत-बांगलादेश संबंधांवर ताण निर्माण होण्याची शक्यता आहे.