संघाची विचारसरणी राष्ट्रवादावर आधारित : पुंडलिक

* प्रबुद्ध नागरिकांची जनसंगोष्ठी

    दिनांक :20-Dec-2025
Total Views |
हिंगणघाट, 
ambarish-pundalik : भारत माझा देश आहे किंवा हमारी राष्ट्रीयता, हा एका वायाचा विषय. पण आज देशाच्या नागरिकांच्या मनात हेतूपूर्वक संभ्रम निर्माण करण्यात येत आहे, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे विदर्भ प्रांत प्रज्ञा प्रवाह प्रचार प्रमुख अंबरीश पुंडलिक यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त प्रबुद्ध नागरिकांच्या जनसंगोष्ठी कार्यक्रमात ते हमारी राष्ट्रीयता या विषयावर बोलत होते. याप्रसंगी जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, नगरसंघचालक विनोद नांदुरकर, यवतमाळ विभाग कार्यवाह अंकुश रामगडे, भारतीय विचार मंच हिंगणघाटचे संयोजक दत्ता भांगे उपस्थित होते.
 
 
RSS
 
 
 
पुंडलिक पुढे म्हणाले, भारत हा विविधतापूर्ण देश आहे. ज्यात विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि उपासना पद्धती एकत्रितपणे नांदतात. पाश्चिमात्य देशांमध्ये राष्ट्रवादाची व्याख्या वेगळी असू शकते. परंतु, भारताची राष्ट्रव्याख्या ही विविधता आणि एकतेच्या सूत्रावर आधारित आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये एकच धर्म किंवा संस्कृती असू शकते. स्वामी विवेकानंद म्हणतात की, प्रत्येक गोष्टीमध्ये धर्म पाहणारे माणूस हा भारतीय आहे. भारतात जन्म, मृत्यू, संस्कार आणि विचार हे धर्माने पाळले जातात. भारतात प्रत्येक गोष्टीमध्ये धर्म पाहणारा माणूस हा भारतीय आहे. काही लोकांच्या मते भारत १९४७ नंतर जन्माला आलेले राष्ट्र आहे, असा खोटा भ्रम पसरविला जात आहे. परंतु, ही कल्पना चुकीची आहे. भारताची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक धरोहर हजारो वर्षांपूर्वीची आहे.
 
 
भारत, चीन शिवाय इतर कोणत्याही देशावर ४०० वर्षांपेक्षा जास्त काळ आक्रमण झाले नाही. भारत, चीन वगळता कोणताही देश २४०० वर्ष जुना नाही. भारतीय संस्कृतीची मुळे ७ हजार वर्षांपूर्वीची आहेत. आजही भारतीय लोकांना ७ हजार वर्षांचे स्मरण आहे. अन्य देशात सांस्कृतिक विस्मरण झाले आहे, असेही अंबरीश पुंडलिक म्हणाले.
 
 
आज जगाला भारताची आवश्यकता आहे. कारण, जगात शांतता फत भारत निर्माण करू शकतो. जग हे ग्लोबल मार्केट झालेले आहे. पण, भारतात वसुधैव कुटुंबकम पद्धत अजूनही मानली जाते. फ्रान्समध्ये असलेली डावे-उजवी संकल्पना भारताला लागू होत नाही. भारताची स्वतःची वेगळी सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय व्यवस्था आहे. भारतातही ही संकल्पना लादण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ही संकल्पना मान्य नाही. काही लोकं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उजव्या लोकांची संघटना म्हणतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक राष्ट्रवादी संघटना आहे. ती भारताच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकतेच्या विचाराला समर्थन देते. संघाची विचारसरणी ही डावी-उजवी संकल्पनेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रहित आणि सांस्कृतिक राष्ट्रवादावर केंद्रीत आहे. संघाच्या भारतीय किसान संघासह विविध आयामांद्वारे देशातील विविध क्षेत्रातील नागरिकांसाठी काम केले जाते, ज्यामुळे संघाला केवळ उजव्या किंवा डाव्या विचारसरणीचा म्हणने चुकीचे आहे. संघाचे स्वयंसेवक कोणत्याही विचारसरणीत अडकत नाहीत ते फक्त राष्ट्राच्या हितासाठी काम करतात, असे ते म्हणाले.
 
 
याप्रसंगी अंकुश रामगडे यानी पंच परिवर्तनातून समाज परिवर्तन या विषयावर बोलताना म्हणाले ’पंच परिवर्तन’ ही आज सर्वसामान्य समाजाची गरज आहे. समाजातील समरसतेचा आग्रह, पर्यावरणपूरक जीवनशैली, कौटुंबिक मूल्यांना चालना देण्यासाठी कौटुंबिक प्रबोधन, जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये ‘स्व’ अर्थात भारतीयत्वाचा आग्रह आणि नागरी कर्तव्यांच्या दृष्टीने समाजाचे प्रबोधन, यांसारख्या पंच परिवर्तनातुन राष्ट्रीय विचारांच्या प्रसाराला गती देण्यासाठी, त्याच्या कार्याला अधिक खोली आणि रुंदी देण्यासाठी स्वंयसेवक ‘पंच परिवर्तन’ संकल्पनेसह सज्ज आहे. पंच परिवर्तन ही आजच्या काळाची आणि समाजाची विशेष गरज आहे. याकरिता समाजाला पंच-परिवर्तन म्हणजे समरसता, पर्यावरण, कुटूंब प्रबोधन, स्वदेशी जीवन आणि नागरी कर्तव्य या मूलभूत तत्त्वांशी परिचित होणे आवश्यक आहे. राष्ट्रनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या मूल्यांची पायाभरणीही याच माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्तावित व संचालन दत्ता भांगे यांनी केले. कार्यक्रमाला नगरातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.