युती जाहीर करताच मनसेला मोठा धक्का

या नेत्याने साथ सोडली

    दिनांक :24-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Shiv Sena आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या राजकारणात आज नवे समीकरण दिसून आले आहे. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऐतिहासिक युतीची अधिकृत घोषणा केली आहे. या युतीमुळे राज्यातील राजकीय वातावरणात मोठी हलचाल झाली आहे आणि मनसेला विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा धक्का बसला आहे.
 

Shiv Sena 
युतीच्या घोषणेनंतर मनसेच्या गळतीची सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेचे जिल्हाप्रमुख सुमित खांबेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. १५ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणूक होणार असून, याआधीच मनसेला मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकीय तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की, युतीच्या घोषणेने मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला मोठी ताकद मिळू शकते.
 
 
राज ठाकरे यांनी मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा केली. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, “आज आम्ही दोघेही इथे बसलो आहोत. आमच्या आजोबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत संघर्ष केला, मुंबई आणि महाराष्ट्र मिळवून दिला. आजही त्या इतिहासाची आठवण करणे आवश्यक आहे. आम्ही मिळून मुंबई महापालिकेत यश मिळवण्यासाठी काम करणार आहोत.”
 
 
यावेळी शिवसेना Shiv Sena प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या भाषणात सांगितले की, “माझ्या वडिलांनी आणि राज ठाकरेंच्या कुटुंबाने केलेल्या संघर्षाची आठवण करून देणे महत्वाचे आहे. संयुक्त महाराष्ट्राची लढाई हा आमच्या पूर्वजांचा वारसा आहे. आता तो वारसा पुढील पिढीसाठी जिवंत ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे.”राजकीय विश्लेषकांच्या मते, ठाकरे बंधुंच्या युतीमुळे मनसेसाठी आगामी महापालिका निवडणूक आव्हानात्मक ठरणार आहे. युतीमुळे मुंबईतील निवडणूक समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. मनसेमध्ये सुरू असलेल्या गळतीला रोखण्यासाठी पक्षाने आताताई उपाययोजना करण्याची गरज आहे.मुंबई महापालिकेतील आगामी निवडणूक या युतीमुळे अधिक रोमांचक आणि कसोटीची ठरणार आहे. राजकीय वर्तुळांमध्ये आता हे चर्चेचे प्रमुख विषय बनले आहेत की, ठाकरे बंधु युती मुंबईत किती जागा जिंकू शकेल आणि मनसे किती प्रमाणात टिकून राहू शकेल.