नियोजित बालविवाह थांबविण्यात जिल्हा प्रशासनास यश

दोन बालविवाह रोखले

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा राळेगाव,
child marriage prevention तालुक्यात गोपालनगर परिसरात दोन बालविवाह जिल्हा प्रशासनाने वेळेवर हस्तक्षेप करून यशस्वीपणे थांबविले. मंगळवार, 23 डिसेंबर रोजी चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कार्यवाही करण्यात आली.
 
 

child marriage prevention
प्राप्त माहितीनुसार दोन बालकांचे वेगवेगळ्या ठिकाणी विवाह होणार होते. अंगणवाडी सेविकेकडील नोंदींच्या आधारे दोन्ही बालकांचे वय 16 वर्षे असल्याचे स्पष्ट झाले. बालविवाह प्रतिबंध अधिनियम, 2006 नुसार बालिकेसाठी किमान 18 वर्षे व बालकासाठी 21 वर्षे वय आवश्यक असल्याने सदर विवाह बालविवाह ठरत असल्याचे निदर्शनास आले. जिल्हा चाईल्ड हेल्पलाईन यवतमाळचे केसवर्कर शुभम दत्ता कोंडलवार व अश्विनी दिलीप नासरे यांनी गाव बाल संरक्षण समिती, अंगणवाडी सेविका सरला आडे, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच तसेच राळेगाव पोलिस अधिकारी व कर्मचाèयांच्या मदतीने हा बालविवाह थांबविला.
 
 
ही कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विशाल जाधव, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सागर विठाळकर व चाईल्ड हेल्पलाईन यवतमाळचे प्रकल्प समन्वयक फाल्गुन पालकर यांच्या मार्गदर्शनात पार पडली.
कायदा काय सांगतो ?
बालविवाह प्रतिबंध अधिनियम, 2006 नुसार मुलीचे किमान वय 18 वर्षे आणि मुलाचे किमान वय 21 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणे हा दंडनीय गुन्हा आहे. बालविवाह घडवून आणणारे, त्यास प्रोत्साहन देणारे किंवा सहकार्य करणाèयांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे समाजाने स्वतःहून सजग राहून अशा घटनांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे.
कार्यवाहीदरम्यान पालकांना बालविवाहाचे दुष्परिणाम व कायदेशीर परिणाम समजावून सांगण्यात आले. पालकांनी बालिकेचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करण्याबाबत लेखी हमी दिली असून त्यांना बालकल्याण समिती, यवतमाळ यांच्यासमोर 24 डिसेंबर रोजी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या