रशियन तेल निर्यातीवर बंदीमुळे भारतावर काय परिणाम होणार?

    दिनांक :26-Sep-2025
Total Views |
रशिया,
Russian oil export ban, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू असल्याने युक्रेनने रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर सातत्याने क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे रशियाच्या तेल शुद्धीकरण क्षमतेवर मोठा परिणाम झाला असून, अनेक बंदरांवरून तेलाच्या निर्यातीवरही थोडा दबाव आला आहे. युद्धामुळे रशियाचे तेल उत्पादन सुमारे २० टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती आहे.
 

Russian oil export ban 
युक्रेनच्या हल्ल्यांमुळे रशियाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर रशियन सरकारने गुरुवारी (२५ सप्टेंबर) डिझेलच्या निर्यातीवर अंशतः बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, पेट्रोलच्या निर्यातीवरील बंदीही यावर्षाच्या अखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे. रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक यांनी स्पष्ट केले की, डिझेलच्या निर्यातीवरील बंदी ही फक्त त्या रिसेलर्ससाठी आहे जे स्वतः डिझेल उत्पादन किंवा शुद्धीकरण करत नाहीत, तर पेट्रोलच्या निर्यातीवरील बंदी सर्व उत्पादक व विक्रेत्यांवर लागू होईल.
 
 
रशियन सरकारी Russian oil export ban वृत्तसंस्था इंटरफॅक्सकडे दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयाचा भारतासह इतर देशांमध्ये आधीपासून झालेल्या सरकारी करारांवर काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे, भारताला रशियाकडून तेल आयातीसाठी कोणतीही अडचण येणार नाही, असे नोव्हाक यांनी आश्वासन दिले आहे. भारत सध्या रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करत असून, अमेरिकेच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवरही हा व्यापार सुरू ठेवला आहे. त्यामुळे रशियाच्या या नवीन निर्णयामुळे भारतावर तातडीने परिणाम होण्याची शक्यता नाही.
 
 
दुसरीकडे, Russian oil export ban क्रीमियाचे राज्यपाल सर्गेई अक्स्योनोव्ह यांनी इंधन पुरवठा कमी झाल्याचे मान्य करताना युक्रेनच्या हल्ल्यांना जबाबदार ठरवले आहे. त्यांनी सांगितले की, अनेक तेलशुद्धीकरण कारखाने बंद असल्यामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. २०२४ मध्ये रशियाने तब्बल ८.६ कोटी मेट्रिक टन डिझेल उत्पादन केले होते, त्यापैकी ३.१ कोटी मेट्रिक टन डिझेलची निर्यात करण्यात आली होती.रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवरील हल्ले आणि त्यानंतरच्या निर्यातीवरील बंदीमुळे जागतिक तेल बाजारात तणाव वाढला आहे, मात्र भारतासारख्या देशांवर याचा तातडीचा परिणाम टाळण्यासाठी रशियाने वेगळे धोरण अवलंबले आहे. भविष्यातील तेल पुरवठा सुरळीत राखण्यासाठी हे पाऊल रशियाकडून घेतल्याचे दिसून येत आहे.तर, युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक तेल व्यापारातील परिस्थिती कशी बदलत आहे, यावर पुढील काळात जगाचे लक्ष लागलेले आहे. भारताला मात्र सध्याच्या स्थितीत या निर्णयामुळे तेल पुरवठा सुरळीत राहण्याची शक्यता आहे.