१०,००० ऐवजी तिप्पट लोक आले आणि ३९ लोकांना गमवावा लागला जीव

    दिनांक :28-Sep-2025
Total Views |
करूर 
karur-stampede तमिळनाडूमधील करूर येथे शनिवारी अभिनेता ते राजकारणी बनलेला विजयच्या सभेत भीषण चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत किमान ३९ जणांचा मृत्यू झाला असून ९५ जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आयोजकांनी सभेला सुमारे १० हजार लोकांची उपस्थिती अपेक्षित धरली होती. मात्र, प्रत्यक्षात लोकांचा ओघ इतका प्रचंड होता की गर्दी थांबवणे अशक्य झाले. करूरच्या रॅली ग्राउंडवर तब्बल २७ हजार लोक जमा झाल्याचे स्पष्ट झाले.
 
 
karur-stampede
 
अधिकाऱ्यांनी सांगितले की रॅली दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत नियोजित होती, परंतु लोक सकाळी ११ वाजेपासूनच येऊ लागले. सकाळपासून विजयची वाट पाहत असताना अनेक लोकांना भूक आणि तहान लागली. सुरक्षा व्यवस्थेबाबत एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, घटनास्थळी ५०० पोलिस तैनात करण्यात आले होते. karur-stampede त्यांनी पुढे सांगितले की, विजयने पोलिसांच्या कामाचे कौतुकही केले. ते म्हणाले, "विजय म्हणाले की, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या गैरव्यवस्थेची जबाबदारी घेतली पाहिजे. गर्दीइतकेच पोलिस तैनात करणे अशक्य आहे." चेंगराचेंगरीचे खरे कारण तपासानंतरच कळेल असे तामिळनाडूच्या डीजीपींनी सांगितले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, चौकशीसाठी एक सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे.
विजयने २०२४ मध्ये तमिळगा वेत्री कळघम पार्टी सुरू केली. ते तीन दशकांपासून तमिळ चित्रपटसृष्टीत स्टार आहेत. असे वृत्त आहे की विजयने संध्याकाळी ७:३० वाजता भाषण सुरू केले होते तेव्हा चेंगराचेंगरी झाली. karur-stampede लोक सकाळपासूनच त्यांची वाट पाहत होते. प्रचंड गर्दी आणि अति आर्द्रतेमुळे लोक बेशुद्ध पडू लागले. अनेक मुले आणि महिला बेशुद्ध पडल्या. त्यानंतर विजयने आपले भाषण थांबवले आणि गर्दीला पाण्याच्या बाटल्या वाटण्यास सुरुवात केली. त्यांनी परिस्थिती हाताळण्याचे आवाहनही पोलिसांना केले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सांगितले की, आतापर्यंत ३९ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात १३ पुरुष, १७ महिला आणि चार मुले आहेत. चेंगराचेंगरीत पाच मुलींचाही मृत्यू झाला. सरकारने मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.