मुलगी होत नसल्यामुळे दोन चिमुकल्यांसह आईची तलावात उडी!

    दिनांक :12-Jan-2026
Total Views |
बहराईच,
mother jumps into a lake with children मुलगा नसल्याच्या टोमण्यांमुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने आपल्या दोन लहान मुलींसह तलावात उडी मारल्याने तिघांचाही मृत्यू झाला आहे. पयागपूर पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून, मृत महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवरून तिच्या पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, मृत महिलेच्या पालकांनी तिच्या पतीसह सासऱ्यांविरुद्ध मारहाणीचा आरोप केला आहे. घटनास्थळी पोलिसांनी गोताखोरांच्या मदतीने तिन्ही मृतदेह तलावातून बाहेर काढले.
 
 

mother jumps 
पयागपूर परिसरातील कोट बाजार येथील रहिवासी विष्णू गुप्ता आपल्या पत्नी आणि तीन मुलींसह भाड्याच्या घरात राहत होते. विष्णू गुप्ता जवळच इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान चालवतो. शनिवारी संध्याकाळी मुलगा नसल्याच्या कारणावरून सासरच्या टोमण्यांवरून वाद झाला. याच दरम्यान महिलेने सात वर्षांची मिस्टी आणि पाच वर्षांची नंदिनी (प्राची) या मुलींसह तलावात उडी मारली.
 
 
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन ताब्यात घेतलेल्या पती आणि सासऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. मृत महिलेच्या पालकांनी पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध हुंडा हत्या आणि छळ यासह विविध कलमांतून गुन्हा नोंदवला आहे. शवविच्छेदनासाठी तिन्ही मृतदेह पाठवण्यात आले आहेत आणि सर्व आरोपांची सविस्तर चौकशी केली जात आहे. मृत महिलेची मोठी मुलगी, १० वर्षांची लाडो, तिच्या आजोबांसोबत राहत होती. या दुःखद घटनेनंतर मोठी मुलगी गंभीर मानसिक स्थितीत आहे, तर गावातील लोकही या घटनेने हादरले आहेत.