सिरमौर,
Five dead in fire in Himachal Pradesh. सिरमौर जिल्ह्यातील श्री रेणुकाजी विधानसभा मतदारसंघातील धांडुरी पंचायतीच्या तलंगणा गावात पहाटे ३ वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत तीन घरांमधील पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लोकेंद्र सिंह यांच्या पत्नी कविता देवी, दोन लहान मुली सारिका (९) व कृतिका (३), तृप्ता देवी (४४) आणि नरेश कुमार यांचा समावेश आहे. या आगीत लोकेंद्र सिंह जखमी झाले आहेत.
आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी एसडीएम संघरा सुनील कुमार आणि पोलीस कर्मचारी रवाना करण्यात आले आहेत. प्रशासन सध्या घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजीव बिंदल यांनी या भीषण घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी मृतकांच्या कुटुंबीयांना सहानुभूती दर्शवित, मृतांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली. तसेच राज्य सरकार आणि प्रशासनाला पीडितांना तातडीने मदत व पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.