बाल महोत्सव बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रभावी व्यासपीठ : विश्वनाथ घुगे

    दिनांक :15-Jan-2026
Total Views |
वाशीम, 
चाचा नेहरू बाल महोत्सव बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ असून, मुलांच्या अंगी असलेली कला, कल्पकता आणि आत्मविश्वास यांना योग्य दिशा मिळाल्यास ते समाजाचे सक्षम नागरिक घडतात. अशा उपक्रमांतून मुलांना स्वतःला व्यक्त करण्याची, आपली ओळख निर्माण करण्याची आणि संघभावनेने काम करण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारीव Washim: Children's Festival  विश्वनाथ घुगे यांनी केले.
 
 
maho
 
बालकांमधील सुप्त कलागुणांना वाव देत त्यांच्यात आत्मविश्वास, बंधुभाव व सांघिक भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने वाशीम येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन १५ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. अलका मकासरे होत्या. यावेळी डॉ. मंजुश्री जांभरुणकर, जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे, नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सचिन खरात, विधी अधिकारी महेश महामुने, अ‍ॅड. अनिल उंडाळ, परिविक्षाधिन अधिकारी निवृत्ती जटाळे, महिला व बाल संरक्षण अधिकारी महादेव जवळकर, परिविक्षाधीन अधिकारी, गजानन पडघान आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
अध्यक्षीय भाषणात डॉ. अलका मकासरे यांनी बालकांचे हक्क, संरक्षण व सर्वांगीण विकास यावर भर दिला. शासनाच्या विविध बालकल्याण योजना आणि समाजाच्या सहकार्यामुळे अनाथ, निराधार व गरजू बालकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडत असून, या महोत्सवामुळे त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा क्रीडा अधिकारी बोंडे यांनीही मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले, अभ्यासासोबतच खेळ खेळही महत्त्वाचा आहे जेणेकरून बालकांचा सर्वांगीण विकास होईल आणि ते सक्षम नागरिक बनतील.
 
 
Washim: Children's Festival तीन दिवस चालणार्‍या या महोत्सवात स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून बालकांनी त्यामध्ये उत्स्फूर्त सहभागासाठी बालसुलभ उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्पर्धांमधून उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या बालकांना पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे. चाचा नेहरू यांच्या बालप्रेमी विचारांना साजेशा वातावरणात साजरा होणारा हा महोत्सव वाशीम जिल्ह्यातील बालकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला नवी दिशा देणारा उपक्रम म्हणून ओळख निर्माण करीत आहे. कार्यक्रमाला परिविक्षाधीन अधिकारी गणेश ठाकरे,प्रकल्प सहयोगी नीलिमा भोंगाडे, विधी सल्लागार जिनसाजी चौधरी आदींसह महिला व बालविकास, चाईल्ड हेल्पलाइनच्या अधिकारी व कर्मचारी, तालुका संरक्षण अधिकारी आदींनी पुढाकार घेतला. संचालन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले यांनी केले.