पाकिस्तानातील हिंदू कार्यकर्त्याला 'मृत्यूचा फतवा', टीएलपीने दिली जीवे मारण्याची धमकी

    दिनांक :18-Jan-2026
Total Views |
सिंध,  
hindu-activist-from-pakistan-receives-death-fatwa पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हिंदू अल्पसंख्याक हक्क कार्यकर्ते शिवा कच्छीने एक मार्मिक व्हिडिओ अपील जारी केले आहे. अल्पवयीन हिंदू मुलींचे जबरदस्तीने अपहरण आणि धर्मांतर करण्याविरुद्ध बोलल्यामुळे त्यांच्या जीवाला गंभीर धोका असल्याचे त्यानी म्हटले आहे. तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) च्या सरहिंदी गटाशी संबंधित धर्मगुरूनी त्याच्याविरुद्ध फतवा जारी केल्याचा आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यानी केला. कच्छी यानी सांगितले की संघीय सरकार, सिंध सरकार आणि पोलिस पूर्ण मौन आणि निष्क्रियता दाखवत आहेत, ज्याला ते "राज्य अपयश आणि गुन्हेगारी सहभाग" म्हणतात. कच्छी हे अल्पसंख्याक हक्क संघटना दरवार इत्तेहादचे अध्यक्ष आणि संस्थापक आहे.
 
hindu-activist-from-pakistan-receives-death-fatwa
 
त्यानी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत आंतरराष्ट्रीय समुदायाकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्र, अमेरिकन सरकार, ह्युमन राइट्स वॉच, ॲमनेस्टी इंटरनॅशनल आणि इतर संस्थांना टॅग करत त्यानी स्पष्ट केले की, जर त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला काहीही झाले, तर त्याची संपूर्ण जबाबदारी पाकिस्तान सरकारची असेल. hindu-activist-from-pakistan-receives-death-fatwa शिवा कच्छीने म्हटले आहे की, धार्मिक कट्टरता, जबरदस्तीचे धर्मांतर आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणे हेच माझे एकमेव ‘गुन्हे’ आहेत. जर कट्टरपंथी उघडपणे धमक्या देत असतील आणि सरकार डोळेझाक करत असेल, तर पाकिस्तानमध्ये कोणीही सुरक्षित नाही, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतात हिंदू समाजाची सर्वाधिक लोकसंख्या आहे. देशातील एकूण हिंदू लोकसंख्येपैकी (सुमारे 40 ते 50 लाख) तब्बल 94 टक्के लोक सिंधमध्ये राहतात. 2023 च्या जनगणनेनुसार, उमरकोट हा पाकिस्तानातील एकमेव हिंदूबहुल जिल्हा असून, तेथे सुमारे 52 टक्के हिंदू लोकसंख्या आहे. शिवा कच्छी यांनी दावा केला आहे की, जबरदस्तीने अपहरण करून धर्मांतर घडवून आणलेल्या आणि नंतर मुस्लिमांशी विवाह लावून दिलेल्या अनेक हिंदू मुलींना त्यानी त्यांच्या कुटुंबांशी पुन्हा जोडले आहे.
सौजन्य : सोशल मीडिया 
त्यानी सरहिंदी गटावर आरोप करत म्हटले आहे की, हे गट त्यांना ‘इस्लामविरोधी’ आणि ‘राज्यविरोधी’ ठरवून त्यांच्याविरोधात हिंसाचार भडकवत आहेत. मानवाधिकार संघटनांच्या माहितीनुसार, सिंध प्रांतात दरवर्षी शेकडो अल्पवयीन हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचे अपहरण करून जबरदस्तीने धर्मांतर केले जाते, मात्र या प्रकरणांत दोषींवर कारवाईचे प्रमाण अत्यंत कमी आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये टीएलपीवर बंदी घालण्यात आली असली, तरी त्याचे गट अद्याप सक्रिय असून अल्पसंख्याक समुदायातील कार्यकर्त्यांना लक्ष्य करत आहेत. शिवा कच्छी यांनी यापूर्वीही डिसेंबर 2025 मध्ये अशीच आंतरराष्ट्रीय स्तरावर मदतीची मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी डॉ. शहानवाज कुम्भार यांच्या हत्येचा उल्लेख केला होता. hindu-activist-from-pakistan-receives-death-fatwa खोट्या धर्मनिंदेच्या आरोपाखाली पोलिस कोठडीत असताना त्यांची हत्या करण्यात आली होती. याचप्रमाणे, नोव्हेंबर 2025 मध्ये एका अल्पवयीन हिंदू मुलीच्या अपहरण, जबरदस्तीच्या धर्मांतर आणि मुस्लिमाशी विवाह लावून देण्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला होता.