नवी दिल्ली,
The Governor's boycott तामिळनाडू सरकार आणि राज्यपाल आर.एन. रवी यांच्यात पुन्हा एकदा वाद प्रकट झाला आहे. मंगळवारी आर.एन. रवी विधानसभेच्या अधिवेशनात सहभागी न राहता मध्येच सभागृहातून बाहेर पडले. राज्यपालांनी तमिळ गीतानंतर राष्ट्रगीत वाजवण्याची मागणी केली, जी सभागृहाचे अध्यक्ष अप्पावु यांनी मान्य करण्यास नकार दिला. यामुळे आर.एन. रवी यांनी सभागृहाला संबोधित न करता कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
राज्यपालांनी विधानसभेवर बहिष्कार टाकण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. यापूर्वी २०२४ आणि २०२५ मध्ये देखील त्यांनी विधानसभेला संबोधित केले नव्हते. तामिळनाडू लोकभवनाने या घटनेची माहिती देणारी प्रेस विज्ञप्ती जारी केली आहे. राज्यपाल आर.एन. रवी यांनी आपले मत मांडताना म्हटले, राष्ट्रगीताचा योग्य आदर केला जात नाही यामुळे मला खूप दुःख झाले आहे. भाषणात व्यत्यय आणले गेले हे दुर्दैवी आहे. मला माझ्या जबाबदाऱ्यांची पूर्ण जाणीव आहे, परंतु राष्ट्रगीताला संपूर्ण आदर मिळणे आवश्यक आहे. या वादामुळे तामिळनाडू विधानसभेत राजकीय वातावरण तापले असून, बहिष्कारामुळे सभागृहाचे कामकाज प्रभावित झाले आहे.