ठाकरें गटातून 26 नेते 'क्लीन बोल्ड' नेत्यांवर कडक कारवाई!

    दिनांक :04-Jan-2026
Total Views |
मुंबई,
Uddhav Thackeray मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शिस्तीचा कडक बडगा उगारला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीतही माघार न घेता, पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसमोर आव्हान उभे करणाऱ्या 26  प्रमुख पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मातोश्रीवरून वारंवार देण्यात आलेल्या सूचना आणि अल्टिमेटम धुडकावून लावणाऱ्या या नेत्यांवर थेट कारवाई केल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरु असताना, शिवसेना (ठाकरे गट) ने बंडखोर नेत्यांवर कडक कारवाई करत मोठा निर्णय घेतला आहे. पुणे आणि मुंबईसह राज्यातील 29  महापालिकांसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आठ वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीमुळे इच्छुक उमेदवारांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त होती. युतीच्या समीकरणामुळेही अनेक नेत्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, ज्यामुळे पक्षात काही ठराविक नेते बंडखोरी करताना दिसले.
 
 
 
Uddhav Thackeray
अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरही अनेक नेत्यांनी अधिकृत उमेदवारी न मिळाल्याबद्दल अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. यामुळे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबंधित नेत्यांना पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. हकालपट्टी झालेल्या नेत्यांमध्ये मुंबईतील प्रभाग क्र. 95  चे शेखर वायंगणकर यांचा समावेश आहे. वायंगणकर हे विधान परिषद आमदार आणि ज्येष्ठ नेते अनिल परब यांचे निकटवर्ती मानले जातात. वांद्रे पूर्व-पश्चिम परिसरातील पक्ष संघटनेत त्यांनी मोठा प्रयत्न केला, तरीही त्यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
 
 
पक्षाने जारी केलेल्या Uddhav Thackeray अधिकृत पत्रकात हकालपट्टी झालेल्या पदाधिकाऱ्यांची यादी आणि संबंधित प्रभागांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पत्रकात स्पष्ट म्हटले आहे की, पक्षाचे उमेदवार अधिकृत अर्ज दाखल करून निवडणुकीत भाग घेत असताना, काही पदाधिकाऱ्यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज भरला. अनेकदा सांगितले तरीही त्यांनी अर्ज मागे न घेतल्यामुळे पक्षासाठी धोका निर्माण होऊ शकतो. एकाच प्रभागात एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास शिवसेनेची मते विभागली जातात, ज्याचा फायदा प्रतिपक्ष भाजप किंवा शिंदे गटाला होऊ शकतो.या निर्णयामुळे ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे की, पक्षाच्या अनुशासन आणि संघटनात्मक सुसंगतीसाठी बंडखोर नेत्यांना पक्षाबाहेर काढणे अपरिहार्य होते. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाची ताकद मजबूत राहील, असा पक्षाचे म्हणणे आहे.
 
कारवाई मागची कारण काय?
 
 
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी ज्यांना अधिकृत उमेदवारी (AB Form) दिली होती, त्यांच्या विरोधात या पदाधिकाऱ्यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज भरला. वारंवार सांगूनही त्यांनी अर्ज मागे घेतला नाही.
 
 
मुंबईत अनेक ठिकाणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची युती आहे. काही जागा मित्रपक्षांना सुटल्या आहेत. तिथेही शिवसेनेच्या काही लोकांनी बंडखोरी केली, ज्यामुळे युतीमध्ये बिघाडी होऊ नये म्हणून ही कारवाई केली.
 
 
एकाच पक्षाचे दोन उमेदवार उभे राहिल्याने शिवसेनेची मते विभागली जातात. याचा थेट फायदा भाजप किंवा शिंदे गटाला होऊ शकतो. हे नुकसान टाळण्यासाठी बंडखोरांना पक्षाबाहेर काढले गेले.
 
 
पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही हा संदेश तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही मोठी कारवाई करण्यात आली. निवडणुकीच्या काळात शिस्त पाळणे अनिवार्य असल्याचे पक्षाने स्पष्ट केले.
 
शेखर वायंगणकर यांच्यासारखे मोठे आणि जवळचे नेते जेव्हा बंडखोरी करतात, तेव्हा पक्ष अधिक कमकुवत दिसू लागतो. इतर पदाधिकाऱ्यांनी अशी हिंमत करू नये, म्हणून मोठ्या नावांवरही कारवाई करण्यात आली.