चार वर्षांची सेवा, पण लग्नावर बंदी! अग्निवीरांसाठी लष्कराची स्पष्ट गाईडलाईन

    दिनांक :07-Jan-2026
Total Views |

नवी दिल्ली, 
guidelines for agniveers भारतीय लष्करात अग्निवीर म्हणून सेवा देणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाचा आणि निर्णायक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर कायमस्वरूपी सैनिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अग्निवीरांसाठी लष्कराने विवाहासंदर्भात नवे आणि कठोर नियम लागू केले आहेत. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित अग्निवीराला थेट कायमस्वरूपी नियुक्ती प्रक्रियेतून बाद केले जाणार आहे.
 
 
अग्नीवर
 
 
लष्कराने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत अग्निवीराची भारतीय सैन्यात कायमस्वरूपी सैनिक म्हणून अधिकृत नियुक्ती होत नाही, तोपर्यंत त्याला विवाह करता येणार नाही. चार वर्षांच्या सेवाकालावधीत किंवा त्या सेवेनंतर सुरू होणाऱ्या निवड प्रक्रियेच्या काळात लग्न केल्यास संबंधित उमेदवार कायमस्वरूपी सेवेसाठी अपात्र ठरेल.
लष्कराच्या माहितीनुसार, चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतरही कायमस्वरूपी निवडीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण चार ते सहा महिने कालावधी लागतो. या काळात अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईपर्यंत आणि अधिकृत नियुक्ती आदेश मिळेपर्यंत अग्निवीरांनी अविवाहित राहणे बंधनकारक असेल. या नियमांचे उल्लंघन केल्यास त्या अग्निवीराला निवड प्रक्रियेतून पूर्णपणे वगळण्यात येईल.
अग्निवीर योजना २०२२ मध्ये सुरू करण्यात आली असून, आता पहिली बॅच चार वर्षांची सेवा पूर्ण करण्याच्या टप्प्यावर पोहोचली आहे. त्यामुळेच लष्कराने या नियमांबाबत अधिक स्पष्टता दिली आहे. लष्कराच्या धोरणानुसार, प्रत्येक बॅचमधील केवळ २५ टक्के अग्निवीरांनाच त्यांच्या गुणवत्ता, शारीरिक क्षमता आणि कामगिरीच्या आधारे कायमस्वरूपी सैनिक म्हणून निवडले जाणार आहे.
लष्कराने हेही स्पष्ट केले आहे की, एकदा का अग्निवीराची निवड कायमस्वरूपी सैनिक म्हणून झाली, तर त्यानंतर त्याला लग्नाबाबत कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. नियुक्तीनंतर विवाह करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य त्याला मिळेल आणि तो आपल्या वैयक्तिक आयुष्याचे निर्णय स्वेच्छेने घेऊ शकेल.guidelines for agniveers या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे अग्निवीरांनी वैयक्तिक आयुष्याशी संबंधित निर्णय घेताना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली असून, कायमस्वरूपी सेवेसाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी हे नियम अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.