नागपूर,
Shakti Samvad 2026 विश्वमांगल छात्र सभा, जी १६ ते २५ वयोगटातील युवतींसाठी कार्यरत असून भारतातील युवतींमध्ये सांस्कृतिक नेतृत्व निर्माण करण्यावर आणि करिअरसोबत सर्वांगीण विकास साधण्यावर भर देते, यांनी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी नागपूरमध्ये “शक्तीसंवाद २०२६” या नावाने सहावा छात्र परिषद आयोजित केला.
नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातील युवतींनी या परिषदेत उत्साहाने सहभाग घेतला. परिषदेत भारतीय अभिव्यक्तीची ओळख, योग्य विमर्श आणि युवतींसाठी संवाद यावर लक्ष केंद्रित केले गेले. Shakti Samvad 2026 यावेळी “युवा संसदे” आणि “रिल उत्सव” या दोन्ही स्वरूपातील सत्रांचे आयोजन करण्यात आले, तसेच भारतीय संस्कृती आणि भारतीय कुटुंब संस्था या विषयांवर संसदसत्र आयोजित झाले.
उद्घाटन प्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, विश्वमांगल्य सभेच्या राष्ट्रीय संघटन प्रमुख डॉ. वृषालीताई जोशी, अखिल भारतीय अध्यक्षा डॉ. कीर्ती पातुरकर, अखिल भारतीय संयोजिका श्रुती देशपांडे, सहसंयोजिका कुमारी गुणाक्षी धनेगावकर आणि नागपूर कार्यकारणी तसेच इतर प्राध्यापक उपस्थित होते. Shakti Samvad 2026 कुलगुरूंनी तरुणींना मार्गदर्शन केले आणि स्वतःचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अशा संस्थांशी जोडले जाण्याचे आवाहन केले. संपूर्ण परिषद युवतींच्या उत्साही सहभागामुळे यशस्वी ठरली.
सौजन्य: गौरी बोलारे, संपर्क मित्र