भारताच्या विजयावर नाराजी; झिम्बाब्वे कर्णधाराचा टीम इंडियावर संताप

    दिनांक :27-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली,  
zimbabwe-captain-angry-with-team-india झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-ट्वेंटी मॅचमध्ये टीम इंडियाने चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर ७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या पराभवामुळे झिम्बाब्वेची टीम वर्ल्ड कपमधून बाहेर झाली आहे. या मॅचनंतर झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने सामन्याबाबत आपली नाराजी व्यक्त केली.

zimbabwe-captain-angry-with-team-india 
 
रझानेच्या म्हणण्यानुसार, टीम इंडियाने दिलेलं २५७ धावांचं आव्हान पाहून त्यांचा संघ आधीच मानसिकदृष्ट्या मागे राहिला होता. बॅटिंग विभागात खेळाडूंनी सुधारणा दाखवली असून पहिल्या ६ ओव्हरमध्ये संघाने चांगला खेळ केला, मात्र काही ओव्हरमध्येच मॅच जिंकता येत नाही, विकेट्स गमावल्यास हार निश्चित होते, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेलच्या कामगिरीवरही टीका केली. तरुण खेळाडूंनी मागील चुका लक्षात ठेवून या मॅचमध्ये सुधारित कामगिरी केली, असा रझानेचा विश्वास आहे. zimbabwe-captain-angry-with-team-india बॉलिंग आणि फिल्डिंगच्या बाबतीत मात्र रझाने नाराज असून सुधारणा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डिफेन्सिव्ह प्लॅन्स नीट अमलात न आणल्यामुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली. जर बॉलर्सनी शिस्तबद्ध मारा केला असता, तर टीम इंडियाला २१०–२२० धावांपर्यंत रोखणे शक्य झाले असते, असे त्यांनी सांगितले. वर्ल्ड कपसारख्या स्पर्धेत टिकण्यासाठी बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही विभागांत समन्वय आवश्यक असल्याचे रझानेने अधोरेखित केले.
सिकंदर रझाने म्हणाले की झिम्बाब्वे संघ सध्या प्रगतीच्या टप्प्यावर आहे आणि अनेक खेळाडू पहिल्यांदाच भारतात खेळत आहेत. अनुभवाचा अभाव असला तरी खेळाडू प्रत्येक बॉलमधून नवीन शिकत आहेत. वर्ल्ड कपमधून बाहेर पडला तरी पुढील मॅच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे, जिथे संघ सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. zimbabwe-captain-angry-with-team-india त्यांनी फलंदाजीतील फॉर्म कायम ठेवून फिल्डिंग आणि बॉलिंगमध्ये सुधारणा करून विजयाची संधी मिळवण्याची आशा व्यक्त केली आहे. शेवटच्या मॅचमध्ये झिम्बाब्वे संघ पूर्ण ताकदीने उतरून सकारात्मक निकाल मिळवण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास रझानेने व्यक्त केला.