नवी दिल्ली,
Marriage is important to Indians जगभरात नातेसंबंधांविषयी उत्सुकता कायम असली तरी वेगवेगळ्या देशांत त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. ॲस्ट्रोटॉक यांनी एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत केलेल्या विश्लेषणानुसार भारतात लोकांचा कल प्रामुख्याने विवाहाकडे असल्याचे दिसून आले. येथे मोठ्या प्रमाणावर लोक आपले लग्न कधी होईल, जोडीदार कसा असेल आणि भविष्यातील संसार कसा असेल, याबाबत मार्गदर्शन घेतात. त्यामुळे भारतीय समाजात विवाहाला अजूनही अत्यंत महत्त्वाचे स्थान असल्याचे या आकडेवारीतून दिसते.
दुसरीकडे अमेरिका मध्ये लोकांचा भर केवळ विवाहावर नसून नात्याच्या गुणवत्तेवर अधिक असतो. तेथे लोक जोडीदाराशी सुसंगतता, नातेसंबंध सुधारण्याचे मार्ग, कुटुंब नियोजन किंवा विभक्त झाल्यानंतर पुन्हा एकत्र येण्याची शक्यता यांसारख्या विषयांवर अधिक सल्ला घेतात. या तुलनेत भारतात विवाह हा केंद्रबिंदू राहतो, तर अमेरिकेत नातेसंबंध अधिक व्यापक पद्धतीने पाहिले जातात.
या अभ्यासातून हेही समोर आले की नातेसंबंध आणि विवाहाशी संबंधित प्रश्नांमधून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते, म्हणजेच हा विषय सर्वत्र महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर भारतात करिअर आणि व्यवसाय, तर अमेरिकेत आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीविषयीही मोठ्या प्रमाणात सल्लामसलत केली जाते. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळातही लोक ज्योतिषावर विश्वास ठेवत असून, वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ते या माध्यमाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत.