मी नाही, बुमराहच खरा सामनावीर!

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
मुंबई,
Bumrah is real man of the match २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात टीम इंडियाचा विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसनने ४२ चेंडूत ८९ धावा करत भारताला २५३/७ वर स्थिर केले. त्याच्या आक्रमक खेळीमध्ये आठ चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता.यावेळी इंग्लंडने प्रत्युत्तरादाखल सात बाद २४६ धावा केल्या, पण भारताने सात धावांनी विजय मिळवला आणि अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
 

Bumrah is real man of the match 
 
सॅमसनला सामनावीर पुरस्कार मिळाला, तरीही त्याने सांगितले की हा पुरस्कार त्याच्या ऐवजी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मिळायला हवा होता. बुमराहने १८ व्या षटकात फक्त ६ धावा दिल्या आणि कर्णधार हॅरी ब्रुकला फक्त सात धावांवर बाद केले, ज्यामुळे सामन्यात टर्निंग पॉइंट आला.सॅमसनने उपांत्य फेरीनंतर सांगितले, "मी स्वतःला अतिरिक्त वेळ दिला आणि तयारी चांगली केली. इंग्लंडने छान फलंदाजी केली, पण आज विजयाचे सर्व श्रेय बुमराहला जाते. त्याच्यासारखे जागतिक दर्जाचे गोलंदाज पिढीतून एकदाच येतात.
 
सॅमसनने शतक हुकण्याबद्दलही विचार व्यक्त करत म्हटले, शतक नियोजनाने नाही, प्रक्रियेतून बनते. सातत्याने आक्रमक राहणे महत्त्वाचे आहे. मी जे मिळवत आहे त्यावर मी खूप आनंदी आहे आणि संघाच्या विजयात योगदान दिल्याचा मला अभिमान आहे."या विजयामुळे भारताने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आणि संजू सॅमसन सलग दुसऱ्या सामन्यास सामनावीर म्हणून निवडला गेला.