विजय मिळूनही श्रेयस अय्यरला दंड

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Shreyas Iyer fined despite victory भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग सामन्यानंतर पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना अत्यंत चुरशीचा झाला आणि पंजाबने शेवटच्या षटकाराने विजय मिळवला.या सामन्यात अय्यरने कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व चांगल्या पद्धतीने केले. फलंदाजीत त्याने मोठी खेळी केली नसली तरी कमी चेंडूंमध्ये काही महत्त्वपूर्ण धावा केल्या. मात्र, सामन्यानंतर त्याला मोठा धक्का बसला. नियोजित वेळेत पूर्ण षटके टाकण्यात अपयश आल्यामुळे त्याच्यावर दंड ठोठावण्यात आला.
 

shreyas iyer 
 
स्पर्धेच्या नियमांनुसार, ठरावीक वेळेत वीस षटके पूर्ण न झाल्यास कर्णधारावर कारवाई केली जाते. अय्यरच्या बाबतीत ही पहिलीच वेळ असल्याने त्याच्यावर बारा लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पुढे अशीच चूक पुन्हा झाल्यास दंडाची रक्कम वाढणार असून संघातील इतर खेळाडूंनाही त्याचा फटका बसणार आहे. वारंवार नियमभंग झाल्यास कर्णधारावर सामन्याची बंदी घालण्याचीही तरतूद आहे.दरम्यान, सामन्यादरम्यान अय्यरला दुखापतही झाली होती. फलंदाजी करत असताना एक जोरदार फटका त्याच्या हातावर आदळल्याने तो काही क्षण वेदनेत दिसला. मात्र प्राथमिक उपचारानंतर त्याने पुन्हा खेळ सुरू ठेवला. नंतर त्याने स्वतः सांगितले की दुखापत गंभीर नसून तो पूर्णपणे सुरक्षित आहे.