अमेरिकेचा पाकवर विश्वास नाही...पाठविली खोटी विमान!

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
इस्लामाबाद,
America does not trust Pakistan पाकिस्तानची प्रतिमा दहशतवादाशी जोडली जात असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्याबद्दल अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच इराणसारख्या मुस्लिम देशालाही पाकिस्तानातील परिस्थितीबाबत सावध भूमिका घ्यावी लागत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य शांतता चर्चेचे केंद्र पाकिस्तान असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात परिस्थिती अधिक गुंतागुंतीची असल्याचे दिसून येत आहे. वृत्तांनुसार, इराणला आपल्या शिष्टमंडळाच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता होती. संभाव्य हवाई हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन त्यांनी इस्लामाबादकडे अनेक दिशाभूल करणारी विमाने पाठवली. त्यापैकी केवळ एका विमानातून अधिकृत प्रतिनिधीमंडळ प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व जे. डी. व्हान्स करत असून, त्यांच्यासोबत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांचाही समावेश आहे.
 
dominate waterways
 
इस्लामाबादकडे जाताना गालिबाफ यांनी एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विमानातील पुढील आसने रिकामी ठेवून त्या जागी अलीकडील हल्ल्यात मृत्यू पावलेल्या निष्पाप मुलांचे फोटो आणि त्यांच्या वस्तू ठेवण्यात आल्या. हा हल्ला इराणमधील मिनाब भागात घडला असून, त्यासाठी तेहरानने अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले आहे. या घटनेत अनेक शाळकरी मुलांचा मृत्यू झाला होता. या प्रतीकात्मक कृतीतून इराणने हे दाखवण्याचा प्रयत्न केला की, ते केवळ राजकीय प्रतिनिधी म्हणून नव्हे, तर आपल्या नागरिकांच्या वेदना आणि हानीची जाणीव घेऊन चर्चेला सामोरे जात आहेत. दरम्यान, अमेरिकेच्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व जे. डी. व्हान्स करत असून, त्यांच्यासोबत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांसारखे महत्त्वाचे सल्लागारही सहभागी आहेत. या चर्चेत अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र आणि संरक्षण विभागातील तज्ज्ञांचाही समावेश करण्यात आला आहे.
 
 
 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ८ एप्रिलच्या रात्री इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर या प्रदेशात दीर्घकालीन शांततेसाठी पाकिस्तानात चर्चा होणार असल्याचे समोर आले. मात्र लेबनॉनमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे या चर्चांवर अनिश्चिततेचे सावट आहे. इराणी माध्यमांच्या माहितीनुसार, युद्धविरामाशी संबंधित ठराविक अटी पूर्ण झाल्यानंतरच ते चर्चेत सहभागी होतील. निमसरकारी वृत्तसंस्थांनीही याबाबत स्पष्ट केले आहे की, पूर्वनिश्चित अटींची अंमलबजावणी झाल्याशिवाय चर्चा पुढे जाणार नाही. इस्लामाबादला रवाना होण्यापूर्वी गालिबाफ यांनीही याच मुद्द्यांवर भर देत लेबनॉनमधील युद्धविराम आणि इराणी मालमत्तेवरील निर्बंध हटवणे या दोन गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे स्पष्ट केले. या सर्व घडामोडींमुळे पाकिस्तानातील प्रस्तावित चर्चा आणि मध्यपूर्वेतील तणाव याकडे जगाचे लक्ष लागले आहे.