नवी दिल्ली,
vaibhav-suryavanshi-abhishek-sharma : इंडियन प्रीमियर लीग 2026 मध्ये शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या वैभव सूर्यवंशी याच्याबाबत पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू तनवीर अहमद यांनी मोठा आणि वादग्रस्त दावा केला आहे.
तनवीर अहमद यांनी म्हटले आहे की, “जेव्हा वैभव सूर्यवंशी भारतीय संघासाठी खेळेल, तेव्हा लोक अभिषेक शर्माला विसरतील. दोघे एकत्र खेळले तरी अभिषेक त्याच्या जवळपासही दिसणार नाही.”
या वक्तव्यामुळे क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. सूर्यवंशी सध्या आयपीएलमध्ये दमदार फॉर्ममध्ये असून त्याच्या आक्रमक फलंदाजीने चाहत्यांसह तज्ज्ञांनाही प्रभावित केले आहे.
विशेष म्हणजे, केवळ 15 वर्षांच्या वयात सूर्यवंशीने आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलीकडील सामन्यांमध्ये त्याने जलद गतीने धावा करत विरोधी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे.
तनवीर अहमद यांच्या या विधानामुळे मात्र तुलना आणि वादाला तोंड फुटले आहे. अनेक क्रिकेट चाहत्यांनी या दाव्याला अतिशयोक्तीपूर्ण म्हटले असून, काहींनी सूर्यवंशीच्या प्रतिभेचे कौतुकही केले आहे.
एकूणच, वैभव सूर्यवंशीच्या दमदार कामगिरीमुळे तो सध्या क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय ठरला असून, त्याच्या भविष्यासंदर्भात मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.