यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस

भारतीय हवामान विभागाकडून पहिला अंदाज जाहीर

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली
rain forecast भारतीय हवामान विभागाकडून (आयएमडी) आज नैऋत्य मान्सून २०२६ चा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला आहे. यावर्षी देशात सरासरीच्या ९२ टक्के पर्जन्य अंदाज जाहीर करण्यात आला आहे. सामान्य पेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम रविचंद्रन यांनी यावर्षीच्या मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे.
 
IMD 
rain forecast पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांच्या उपस्थित नवी दिल्लीत सोमवारी पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये सामान्य पेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जेव्हा पावसाचे प्रमाण ९० टक्के ते ९५ टक्के असते त्यावेळी सामान्य पेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतो. दरम्यान, संपूर्ण देशभरात दीर्घावधी सरासरी 87 सेंटीमीटर राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहणार
rain forecast भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांच्या माहितीनुसार, जून जुलै ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहणार आहे. जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात अल निनो परिस्थिती असणार आहे. तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये भारतीय समुद्रात सकारात्मक परिस्थिती असल्याची माहिती डॉ. एम. मोहापात्रा यांनी दिली आहे. त्यामुळे एल निनोच्या नकारात्मक परिणामाला भारतीय समुद्रातील सकारात्मक परिस्थिती अनुकूल करेल. त्यामुळं एल निनोचा परिणाम जाणवणार नाही असे डॉ. एम. मोहापात्रा यांनी सांगितले आहे.
rain forecast पाऊस कसा मोजतात?
भारतीय हवामान विभागाने पाऊस मोजण्याच्या पाच श्रेणी ठरवल्या आहेत. सरासरीच्या 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. दुसèया श्रेणीत ९० ते ९५ टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर तिसèया श्रेणीत ९६ ते १०४ टक्के म्हणजे सामान्य सरासरी इतका पाऊस समजला जातो. पुढील दोन श्रेणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०५ ते ११० टक्के आणि ११० टक्क्यांच्या पुढे अधिक पाऊस म्हणजे सर्वाधिक पाऊस समजला जातो.
rain forecast शेतकèयांची चिंता वाढणार
काही खाजगी वेधशाळांनी यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमकुवत राहण्याची शक्यता वर्तवली होती. या पार्श्वभूमीवर, अधिकृत सरकारी यंत्रणा म्हणजे भारतीय हवामान विभाग काय अंदाज मांडणार याकडे देशातील बळीराजा आणि सर्वसामान्यांचे डोळे लागले होते. अखेर आज भारतीय हवामान विभागानं मान्सून २०२६ चा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हा अंदाज अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.