आषाढी वारी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक लांबणीवर

वारकऱ्यांमध्ये उत्सुकता कायम

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
आळंदी
Ashadhi Wari दरवर्षी आळंदी येथून निघणाऱ्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या वेळापत्रकाबाबत वारकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असताना यंदा या वेळापत्रकाच्या जाहीरतेला विलंब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. १३ एप्रिल रोजी हे वेळापत्रक जाहीर होणार होते, मात्र काही नियोजनात्मक अडचणींमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.
 

Ashadhi Wari palkhi schedule delay, 
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या माहितीनुसार, पुणे शहरातील भवानी पेठ येथील विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम ९ आणि १० जुलै रोजी प्रस्तावित आहे. मात्र त्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा आणि व्यवस्थेबाबत अद्याप स्पष्ट आणि लेखी प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. त्यामुळे वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांची पूर्ण खात्री मिळत नसल्याने वेळापत्रक जाहीर करण्यास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
मंदिर प्रशासनाला यासंदर्भात काही सूचना प्राप्त झाल्या असल्या तरी १२ एप्रिलपर्यंत त्यावर कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही. त्यामुळेच हा निर्णय पुढे ढकलण्याची वेळ आल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षितता आणि सोयी यांना सर्वोच्च प्राधान्य देतच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 
या पार्श्वभूमीवर लवकरच संबंधित सर्व घटकांची बैठक आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंदिर व्यवस्थापन, दिंडी प्रमुख तसेच संस्थानचे सदस्य सहभागी होणार आहेत. ही बैठक पुढील आठ दिवसांत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, या विषयावर Ashadhi Wari  अंतिम निर्णय २६ एप्रिल रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार असून वारकरी समाजासमोर संपूर्ण माहिती सादर केली जाईल. त्यानंतर सर्व बाबींचा आढावा घेऊन १ मे रोजी आळंदी येथे पालखी सोहळ्याचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले जाईल, अशी माहिती संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.पालखी सोहळ्याच्या वेळापत्रकात झालेल्या या विलंबामुळे वारकऱ्यांमध्ये काहीशी अनिश्चितता निर्माण झाली असली तरी प्रशासनाकडून लवकरच स्पष्टता मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.