तलावात बुडून तीन भावंडांचा मृत्यू

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
प्रतापगड
child drowning incident कंधाई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शाल्हीपूर कांजस गावात आंघोळ करताना तीन भावंडांचा बुडून मृत्यू झाला. मृतकांमध्ये एका मुलीसह दोन मुलांचा समावेश आहे. ही घटना सोमवारी सकाळी घरासमोरील तलावात घडली. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
 

child drowning incident India, three siblings death, 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, child drowning incident  कांजस गावातील रहिवासी विजय बहादूर यादव यांना चार मुले होती. यापैकी मोठी मुलगी राणी, मुलगा मोहित व रोहित सोमवारी सकाळी घरासमोर असलेल्या तलावात आंघोळीला गेले होते. यादरम्यान, तिघेही तलावात बुडून मरण पावले. मुले गावातील प्राथमिक शाळेत जात होती. वडील विजय बहादूर अर्धांगवायूने ग्रस्त आहेत. आई मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करते.