लखनौ,
dministrative reshuffle in Uttar Pradesh उत्तर प्रदेशमध्ये प्रशासकीय बदल्यांचा मोठा फेरबदल पुन्हा एकदा पाहायला मिळाला असून राज्य सरकारने तब्बल चाळीस वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या निर्णयात पंधरा जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली असून विविध जिल्ह्यांना नवीन प्रशासकीय प्रमुख मिळाले आहेत. प्रशासन अधिक गतिमान आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. या बदल्यांनुसार झाशी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी गौरांग राठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुलतानपूर येथे इंद्रजित सिंग, बुलंदशहर येथे कृतिका शर्मा, श्रावस्ती येथे अन्नपूर्णा गर्ग आणि शामली येथे आलोक यादव यांना जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. सहारनपूर येथे अरविंद कुमार चौहान, अमरोहा येथे नितीन गौर, हमीरपूर येथे अभिषेक गोयल आणि फतेहपूर येथे निधी गुप्ता वत्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रायबरेली येथे हर्षिता माथूर, उन्नाव येथे घनश्याम मीना, लखीमपूर खेरी येथे अंजनी कुमार सिंग, मैनपुरी येथे इंद्रजित त्रिपाठी आणि औरैया येथे ब्रिजेश कुमार यांना जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आग्रा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी मनीष बन्सल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या या आदेशानुसार अनेक अधिकाऱ्यांना विविध महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवरही नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. काहींना विशेष सचिव, काहींना व्यवस्थापकीय संचालक तर काहींना विभागीय आयुक्त अशा महत्त्वाच्या पदांवर नियुक्त करण्यात आले आहे.