पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान तणाव 'कार्यकर्ते आमने सामने'

    दिनांक :23-Apr-2026
Total Views |
बंगाल,
West Bengal election violence, पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान राज्यातील अनेक भागांत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. दक्षिण दिनाजपूर, मुर्शिदाबाद, कूच बिहार, सिलिगुडी आणि आसनसोल यांसारख्या ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षांमुळे वातावरण अधिकच तापले आहे.
 

 West Bengal election violence, 
मुर्शिदाबादमध्ये आम जनता उन्नयन पार्टी (AUJP)चे संस्थापक हुमायूं कबीर यांच्या दौऱ्यादरम्यान तणाव निर्माण झाला. काही वेळातच स्थानिक तृणमूल काँग्रेस (टीएमसी) कार्यकर्ते आणि हुमायूं कबीर यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक वाद वाढून परिस्थिती बिघडली. व्हिडिओमध्ये कबीर आणि जमाव आमनेसामने उभे असल्याचे दिसून येत असून दोन्ही बाजूंमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट होते. घटनास्थळी उपस्थित सुरक्षा दलांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. हा दौरा त्या परिसरात करण्यात आला होता, जिथे काल कच्चा बॉम्ब फेकल्याची घटना घडली होती.
दरम्यान, कूच बिहारमध्ये West Bengal election violence, टीएमसी कार्यकर्त्यांनी रस्ता रोखून धरल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सिलिगुडी परिसरात भारतीय जनता पक्ष आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटापटीमुळे तणाव वाढला. दक्षिण दिनाजपूरमधील कुमारगंज विधानसभा क्षेत्रातील बूथ क्रमांक 24 वरही दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष झाल्याचे वृत्त आहे. भाजपकडून टीएमसीवर त्यांच्या बूथ एजंटला मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यापासून रोखल्याचा आरोप करण्यात आला आहे.आसनसोलमध्येही भाजप नेत्या अग्निमित्रा पॉल यांच्या वाहनाला पोलिसांनी थांबविल्याने वाद निर्माण झाला. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.या सर्व घटनांदरम्यान राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान उत्साहात सुरू असल्याचे दिसत आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी हजेरी लावली असून सकाळी 7 वाजता मतदान सुरू झाल्यापासून मतदान केंद्रांवर मतदारांची सातत्याने ये-जा सुरू आहे. कडक उन्हाळा असूनही मतदारांचा उत्साह कायम असल्याचे चित्र दिसत आहे.राज्यातील या घडामोडींमुळे निवडणूक प्रक्रियेतील शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.