रस्ते ओस, हवामानामुळे अघोषित ‘संचारबंदी’

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
तापमान 44 अंशाच्यावर

आर्णी, 
Temperature: Unannounced 'curfew' गेल्या 15 दिवसांपासून सूर्य तळपू लागला आहे. कमाल तापमान दररोज वाढत आहे. 20 एप्रिलपासून आर्णी तहसीलचे तापमान सातत्याने वाढत आहे. आर्णी शहरात दुपारी 44.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाढत्या तापमानामुळे होणाèया तीव्र उष्णतेमुळे आता नागरिक त्रस्त झाले आहेत. शहराचे नेहमी गजबजलेले रस्तेही दुपारच्या वेळी ओस पडलेले दिसतात, जणू काही अघोषित संचारबंदी किंवा दळणवळण बंदी लागू झाली आहे. पाण्याच्या टाकीपासून ते शिवनेरी चौक, तहसील चौक बस स्थानक, उत्तम टॉकीज रोड, शिवाजी चौक, आंबेडकर पुतळा चौक आणि आर्णी कृषी उत्पादन बाजार समिती परिसरापर्यंत, जिथे दिवसभर वाहतूक नेहमीच व्यस्त असते.
 
 
aarni
 
तिथले रस्ते आता दुपारच्या वेळी ओस पडलेले असतात. दुपारी रस्त्यांवर मोजकीच वाहने दिसतात. उकाड्यापासून वाचण्यासाठी लोक शीतपेये, ऊस आणि फळांच्या रसाचा आधार घेत आहेत. उष्णतेची लाट पहाटेपासूनच सुरू होते आणि दुपारपर्यंत तापमान उच्चांक गाठते. उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी चालक आता टोपी किंवा स्कार्फ घालत आहेत. दुपारी 1 ते 4-5 दरम्यान शहरातील मुख्य रस्तेसुद्धा ओस पडलेले असतात. तहसील आरोग्य अधिकारी डॉ. आरती नाटकर आणि ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमा बाजोरिया यांनी सांगितले की, उष्णता लाटेच्या पार्श्वभूमीवर, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांसह सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये शीतगृहासारख्या (कोल्ड रूम) व्यवस्थेची आवश्यकता भासू शकते.
 
 
या तीव्र उष्णतेपासून वाचण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडणे टाळावे. शक्य तितके पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. उष्माघाताच्या बळींच्या उपचारासाठी सर्व आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तथापि, आजपर्यंत तहसील किंवा शहरात उष्माघाताची एकही घटना नोंदवली गेली नाही. केवळ अत्यावश्यक कामासाठीच दुपारी घराबाहेर पडा. डोके झाकण्यासाठी टोपी किंवा टॉवेल वापरा. डोकेदुखी, ताप किंवा अंगदुखी जाणवल्यास लोकांनी तत्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
 
 
Temperature: Unannounced 'curfew'  हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वृद्ध आणि लहान मुलांनी विशेषतः सावधगिरी बाळगावी. आर्णीमध्ये तापमान सुमारे 44.5 अंश सेल्सिअस होते. त्यामुळे शहरातील मुख्य रस्ते आणि इतर भाग ओस पडले होते. वाढत्या तापमानामुळे रहिवासी घराबाहेर पडणे टाळत असून, कूलर आणि एअर कंडिशनरमध्ये आरामात थांबले आहेत. दैनंदिन कामांसाठी बाहेर पडणारे लोकही तीव्र उष्णतेमुळे सावली शोधताना दिसत आहेत. हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवसांत आणखी एका उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. पुढील काही दिवस मजुरांना फक्त सकाळी 10 पर्यंत आणि दुपारी 4 नंतरच काम करणे योग्य ठरणार आहे.
आरोग्य विभाग सज्ज
आरोग्य विभागाने उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी केली आहे. शासकीय ग्रामीण रुग्णालयात शीतगृहे तयार करण्यात आली आहेत. औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यात आला असून, तातडीच्या मदतीसाठी रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे, भरपूर पाणी प्यावे आणि कोणतीही समस्या उद्भवल्यास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात जावे. सर्व सुविधा उपलब्ध आहेत, असे ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमा बाजोरिया यांनी सांगितले.