महाराष्ट्राच्या नादी लागू नका!

धीरेंद्र शास्त्रींवर रामदास आठवले तापले

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
मुंबई,
Ramdas Athawale gets angry नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी करण्यात आलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभर तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या विधानानंतर विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि शिवप्रेमी नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत निषेध नोंदवला असून अनेक ठिकाणी आंदोलनही झाले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या प्रकरणावर कठोर शब्दांत प्रतिक्रिया देत संबंधित वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी अप्रत्यक्ष इशारा देत म्हटले की, महाराष्ट्राचा इतिहास आणि शिवरायांचा वारसा हा कोणत्याही प्रकारच्या दिखाव्याचा किंवा प्रसिद्धीसाठी वापरायचा विषय नाही. अशा संवेदनशील विषयांवर बोलताना जबाबदारीने वागणे आवश्यक आहे.
 
 

Ramdas Athawale 
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, महाराष्ट्र हा फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवरायांच्या विचारांवर उभा असलेला पुरोगामी राज्य आहे आणि अशा राज्याच्या भावना दुखावणारी कोणतीही कृती स्वीकारली जाणार नाही. समाजात चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी प्रत्येकाने संयम आणि जबाबदारीने बोलणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने त्यांच्या कार्याबाबत कोणतीही अवमानकारक भाषा सहन केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका विविध नेत्यांनी मांडली आहे. या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.