पावसाचा इशारा कायम! यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली
Delhi weather भारतीय हवामान विभागाने (IMD) दिल्लीसह वायव्य भारतातील काही भागांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागानुसार, पश्चिमी प्रणालीचा प्रभाव ७ आणि ८ एप्रिल रोजी सर्वाधिक जाणवेल, ज्यामुळे दिल्लीत पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या चालू असलेल्या पश्चिमी प्रणालीमुळे देशाच्या वायव्य भागात पावसासोबत गारपिटी आणि काश्मीर खोऱ्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच जम्मू आणि काश्मीरच्या डोंगराळ भागात गेल्या अनेक दिवसांपासून हिमवृष्टी सुरू आहे.
 

Delhi weather forecast April 2026 
दिल्लीत शनिवारी किमान तापमानात किंचित वाढ नोंदवली गेली, तर दिवसभर ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान घटले. आयएमडीने मंगळवारसाठी 'यलो अलर्ट' जारी केला असून, दिवसा एक किंवा दोन वेळा हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी दिल्लीत कमाल तापमान ३०-३२ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान १७-१९ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. आदल्या दिवशी झालेल्या पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यांमुळे दिल्लीच्या हवेची गुणवत्ता सुधारली असून, शनिवारी २४ तासांचा सरासरी AQI १३७ (मध्यम श्रेणी) नोंदवला गेला, तर शुक्रवारी तो २६६ (खराब श्रेणी) होता.
हिमाचल प्रदेशातही हलकाDelhi weather ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टी सुरू आहे. शिमला हवामान कार्यालयाने शनिवारी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, ७-८ एप्रिल रोजी चंबा, कांग्रा, कुल्लू, मंडी आणि शिमला जिल्ह्यांमध्ये गारपिटी, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. लाहौल-स्पिती आणि कुल्लूच्या उंच भागांमध्ये नुकतीच हिमवृष्टी झाली आहे.
राजस्थानातही पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागानुसार, शनिवारी जयपूर, अजमेर, भरतपूर, कोटा आणि उदयपूरमध्ये तुरळक ठिकाणी ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहत असताना मेघगर्जना, गारपिटी आणि मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. बिकानेर आणि जोधपूर भाग मुख्यतः कोरडे राहतील. ६ एप्रिलपासून राज्याच्या काही भागांमध्ये नवीन शक्तिशाली पश्चिमी प्रणाली सक्रिय होण्याची शक्यता असून, जोधपूर, बिकानेर, अजमेर, जयपूर, भरतपूर आणि कोटा जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसासह मेघगर्जना आणि गारपिटी होऊ शकते.हवामान विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, तसेच नागरिकांना पावस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे होऊ शकणाऱ्या धोक्यांपासून बचावाचे उपाय घेण्याची सूचना दिली आहे.