युद्धामुळे ताटातील जेवण महागले

जगभरात खाद्यपदार्थ तीन वर्षांत सर्वात महाग पुरवठा साखळी तुटण्याचा परिणाम

    दिनांक :10-May-2026
Total Views |
नवी दिल्ली
US-Iran war अमेरिका-इराण यांच्यातील सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जगभरातील स्वयंपाकघरांवर दिसू लागला आहे. युनायटेड नेशन्सच्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर अन्नपदार्थांच्या किमती गेल्या तीन वर्षांतील उच्चांकावर पोहोचल्या आहेत.
तर, फूड अँड अ‍ॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन (एफएओ) ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये अन्नधान्य वस्तूंच्या किंमत निर्देशांकात 1.6 टक्के वाढ झाली आहे. ही वाढ मागील वर्षाच्या तुलनेत 2.5 टक्के जास्त आहे.
 

thali 
US-Iran war या वाढीचे मुख्य कारण म्हणजे खाद्यतेल, मांस आणि धान्याच्या पुरवठा साखळीत आलेले अडथळे आहेत. इराण युद्ध आता आपल्या 10व्या आठवड्यात दाखल झाले आहे. हॉर्मुझ मार्ग बंद आहे. या मार्गामुळे डिझेल आणि खत यांसारख्या शेतीसाठी आवश्यक वस्तूंची वाहतूक थांबली आहे.
US-Iran war खत आणि इंधन महाग झाल्याने शेतकèयांसाठी शेती करणे कठीण होत आहे, ज्याचा थेट परिणाम आगामी काळात खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किमतींवर होईल.
 
 
US-Iran war वनस्पती तेल आणि मांसाच्या किमती सर्वाधिक वाढल्या
अहवालानुसार, सर्वाधिक परिणाम वनस्पती तेलांवर झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने बायो-फ्यूएलची मागणी वाढली आहे, त्यामुळे मार्चच्या तुलनेत वनस्पती तेल निर्देशांक 5.9 टक्क्यांनी वाढला आहे. हा जुलै 2022 नंतरचा सर्वाधिक उच्चांक आहे. तर, मांस निर्देशांकात 1.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे, जो आतापर्यंतचा सर्वकालीन उच्चांक आहे. धान्याच्या किमतींमध्येही 0.8 टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे.
US-Iran war पुढे महागाई आणखी वाढणार
एफएओचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ मॅक्सिमो टोरेरो यांनी एका मुलाखतीत सांगितले की, कृषी-अन्न उद्योग सध्या टिकून आहे, कारण कंपन्या जुना साठा विकत आहेत. ते म्हणाले, कच्च्या मालाची आणि ऊर्जेची वाढलेली किंमत कंपन्यांच्या खात्यात पोहोचताच, ग्राहक म्हणून आपल्याला महागाईचा मोठा धक्का बसेल.
त्यांनी इशारा दिला की, जर हा ताण 90 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकला, तर 2026 च्या अखेरीस आणि 2027 मध्ये ‘जागतिक अन्न संकट’ (खाद्य संकट) येण्याची शक्यता खूप वाढेल.
US-Iran war धान्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता
खराब हवामान आणि 2026 मध्ये गव्हाची पेरणी कमी झाल्याच्या बातम्यांमुळे धान्याचे दर वाढले आहेत. खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी आता अशा पिकांची लागवड करण्याचा विचार करत आहेत, ज्यात खतांचा वापर कमी होतो.
तज्ञांचे मत आहे की, कमोडिटी मार्केटमधील या तेजीचा परिणाम किरकोळ बाजारापर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागेल, पण खाण्यापिण्याच्या वस्तूंची महागाई वाढणे आता निश्चित आहे.

20 आवश्यक वस्तूंपैकी 16 चे दर 36 टक्क्यांपर्यंत वाढले
बँक ऑफ बडोदाच्या ‘एसेंशियल कमोडिटी इंडेक्स’नुसार, भारतात एप्रिल महिन्यात महागाई निर्देशांक वार्षिक 1.1 टक्का आणि मासिक आधारावर 0.3 टक्क्याने वाढला. ऑगस्ट 2025 नंतरची ही सर्वात वेगवान मासिक वाढ आहे. गेल्या महिन्यात सामान्य गरजेच्या 20 पैकी 16 वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.
खाद्यतेल, टोमॅटो आणि इतर आवश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये 36 टक्क्यांपर्यंतच्या वाढीमुळे एप्रिलमध्ये किरकोळ महागाई 4 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. पुढील महिन्यांमध्ये महागाई आणखी वाढण्याचा धोका कायम आहे, कारण मे महिन्यातही किमती वाढत आहेत.